AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका, तुमचंच होणार नुकसान

आचार्य चाणक्या यांनी त्यांच्या चाणत्या नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आपण अनेकदा इतरांच्या मदतीसाठी पुढे जातो. पण चाणक्य सांगतात, अशा लोकांची बिलकूल मदत करू नका, असं केल्यास तुमचंच नुकसान होईल....

आचार्य चाणक्य सांगतात, अशा लोकांच्या मदतीसाठी बिलकूल पुढाकार घेऊ नका, तुमचंच होणार नुकसान
| Updated on: Jun 30, 2026 | 3:43 PM
Share

आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांना मदतीची गरज भासते. पण कोणाला मदत करायची आणि कोणाल मदत करु नये, हे समजून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. सांगायचं झालं तर, आयुष्यात यश मिळवण्याची इच्छा नसलेला असा कोणीही नाही. अशा व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस एक शर्यत असतो. मात्र, या प्रयत्नांदरम्यान त्यांना विविध आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशा संकटांवर कशी मात करावी, हे महान विद्वान चाणक्य यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यांच्या ‘चाणक्य नीती’मध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध टप्पे आणि क्षेत्रांचा उल्लेख आहे. चाणक्य नीतीनुसार असं म्हटलं जातं की, काही लोकांना मदत केल्याने तुमचेच नुकसान होतं. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या लोकांची मदत करु नये.

जरी इतरांना मदत करणे हा एक चांगला मानवी गुण असला तरी, कधीकधी आपण केलेली मदत आपल्यासाठीच मोठं दुर्दैव ठरते. प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी, आचार्य चाणक्य, त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात सांगतात की, एखाद्या व्यक्तीला मदत करण्यापूर्वी त्याचा खरा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे. ते असा इशारा देतात की, जर आपण विशिष्ट स्वभावाच्या लोकांना मदत करायला गेलो, तर आपण स्वतःचंच नुकसान करून घेऊ.

चाणक्य म्हणतात की, जे सतत चुका करतात किंवा जे केवळ इतरांचे नुकसान करण्याचा विचार करतात, त्यांना कधीही मदत करू नये. तुम्ही अशा लोकांना कितीही मदत केली तरी, ते स्वतःचा खरा स्वभाव बदलणार नाहीत. एवढंच नही तर, त्यांना इतरांना फसवण्यास आणि अमली पदार्थांच्या सेवनासारख्या वाईट गोष्टींमध्ये गुंतवणं हे देखील चुकीचं आहे. यामुळे तुम्ही मोठ्या धोक्यात सापडू शकता.

काही लोक, त्यांच्याकडे आयुष्यात कितीही असलं तरी, नेहमी त्यांच्या समस्यांबद्दल तक्रार करत राहतात. आयुष्यातील केवळ उणिवा पाहणाऱ्या अशा नकारात्मक लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला नैराश्य येईल. तुम्ही त्यांना कितीही मदत केली तरी, ते नेहमी दुःखीच राहतील आणि तुमची मानसिक शांतीसुद्धा हिरावून घेतील.

काही लोकांना काय बरोबर आहे हे ऐकण्यात अजिबात रस नसतो. ते हट्टी असतात आणि त्यांचा असा विश्वास असतो की फक्त ते जे करतात तेच बरोबर आहे. त्यांच्याशी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करणं हा निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गावर असलेल्या त्यांना सुधारण्याचा किंवा मदत करण्याचा प्रयत्न केला, तर ते तुमचे ऐकणार तर नाहीतच, पण तेच तुम्हाला शत्रू म्हणूनही पाहू शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान