AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचे संबंधी रोग, व्यवसायात नुकसान, या समस्यांपासून बचावासाठी बुधवारचा उपवास ठेवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Lord Ganesha). भगवान गणेशाला बुद्धी देणारा आणि शुभ देव प्रदान करणारे देव मानले जाते. बुधवारच्या उपवासाने घरातील सर्व आपत्ती दूर होतात आणि सुख-शांती नांदते.

त्वचे संबंधी रोग, व्यवसायात नुकसान, या समस्यांपासून बचावासाठी बुधवारचा उपवास ठेवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहिती
Lord Ganesha
| Updated on: May 12, 2021 | 2:43 PM
Share

मुंबई : बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो (Lord Ganesha). भगवान गणेशाला बुद्धी देणारा आणि शुभ देव प्रदान करणारे देव मानले जाते. बुधवारच्या उपवासाने घरातील सर्व आपत्ती दूर होतात आणि सुख-शांती नांदते. या दिवशी गणेशाच्या पूजेबरोबरच बुद्ध देवाचीही पूजा केली जाते (Budhwar Vrat For Skin Problems And Loss In Business Know When To Start).

आपल्याला त्वचेचा कोणताही आजार असल्यास, व्यवसायात तोटा झाला असेल तर कर्जामुळे त्रस्त असल्या किंवा घरी वारंवार त्रास होत असेल तर आपण बुधवारी उपवास करावा. अशा वेळी हा उपवास अतिशय फलदायी मानला जातो. या उपवासाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

या व्रताची सुरुवात कधीपासून करावी?

बुधवारचा व्रत कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून सुरु केला जाऊ शकतो, परंतु विशाखा नक्षत्राच्या बुधवारपासून या उपवासाला सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. अग्निपुराणमध्ये विशाखा नक्षत्रापासून बुधवारच्या उपवासाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, एकदा आपण उपवास सुरु केल्यानंतर किमान सात उपवास पाळावेत. जर समस्या अधिक गंभीर असेल तर 21 किंवा 24 बुधवारपर्यंत उपवास ठेवा. शेवटच्या उपवासाच्या दिवशी उद्यापन करा.

पूजा कशी करावी?

स्नान करुन मंदिरात बुधवारी यंत्र स्थापित करा. यानंतर गणेशाचे स्मरण करा आणि बुधवारी किती उपवास ठेवायचे आहेत त्याचा संकल्प घ्या. यानंतर गणेशाची पूजा करावी. पूजे दरम्यान त्यांना रोली, अक्षत, दीपक, धूप, दक्षिणा इत्यादी अर्पण करा. त्यांना लाडू किंवा मूग डाळीचा शिरा अर्पण करा. बुधदेवचे स्मरण करुन बुध यंत्राचे पूजन करा. बुध यंत्रावर जल आणि हिरवी वेलची, रोली, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा. यानंतर बुधवारच्या उपवासाची कथा वाचा आणि आरती करा.

हे देखील लक्षात ठेवा

बुधवारच्या उपवासादरम्यान मीठाचं सेवन करु नये. दिवसा फळाहार घ्या आणि संध्याकाळी जेवण करा. याशिवाय संध्याकाळी प्रसाद खाल्यावरच उपवास सोडा, त्यानंतर जेवण करा. उपवासाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार हिरवी मूग डाळ, हिरव्या भाज्या, हिरवे कपडे किंवा हिरव्या कोणत्याही वस्तू गरीब किंवा गरजूंना दान करा. कोणालाही फसवू नका किंवा कोणाविषयी निंदनीय शब्द बोलू नका.

Budhwar Vrat For Skin Problems And Loss In Business Know When To Start

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 : अक्षय तृतीयेला ‘या’ शुभ गोष्टी खरेदी करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.