AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या ठिकाणी आयुष्यात कधीच जाऊ नका, उद्ध्वस्त व्हाल, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात अशा काही जागा असतात ज्या नरकापेक्षा कमी नसतात, अशा जागेवर जेव्हा तुम्ही जाता किंवा तुम्हाला नेलं जातं, तेव्हा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या ठिकाणी आयुष्यात कधीच जाऊ नका, उद्ध्वस्त व्हाल, चाणक्य काय म्हणतात?
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 10:10 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजही कालबाह्य वाटत नाहीत, त्या अनेकांना आपलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतात, तसेच माणसानं समाजात कसं वागावं? कुठल्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावेत? याचं भान देखील चाणक्यांच्या या विचारांमुळे निर्माण होण्यास मदत होते. आर्य चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जगात अशा काही जागा असतात जिथे जाणं माणसानं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाळलं पाहिजे, अपघातानं देखील अशा ठिकाणी जाता कामा नये, तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता, तेव्हा तुमचा संसार उद्ध्वस्त होतो. समाजातील मान-सन्मान तुम्ही गमावून बसता, तसेच तुम्ही एका फार मोठ्या संकटात सापडता, त्यामुळे अशा ठिकाणी जाणं हे टाळलंच पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

जिथे आपलं कुणीही नाही – चाणक्य म्हणतात कधीही परक्यांच्या भूमिमध्ये जाऊ नये, जिथे आपलं कुणीच नाही, आपल्याला ओळखणारं कोणी नाही, अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नये, कारण जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता आणि एखाद्या मोठ्या संकटामध्ये सापडता, तेव्हा तिथे तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही, कारण तिथे तुमचं स्वत:चं असं कोणीच नसतं. तसेच जिथे तुमची माणसं नाही, तिथे परकीय लोक हे तुमचं नुकसान देखील करू शकतात, तुमच्यावर हल्ला देखील करू शकतात, प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे अशा ठिकाणी कधीच जाऊ नये.

अपमान – चाणक्य म्हणतात जिथे तुमचा वारंवार अपमान होतो, अशा जागी पुन्हा कधीही जाऊ नये, कारण जर तुमचा वारंवार अपमान होत असेल तर त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो, आणि ज्या माणसाचा आत्मविश्वास कमी आहे, असा माणूस त्याच्या आयुष्यात काहीही करू शकत नाही, त्यामुळे जिथे तुमचा अपमान होतो, किंवा जाणून बुजून करण्यात येतो, अशा ठिकाणी चुकूनही पाऊल ठेवू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रोजगार – चाणक्य म्हणतात ज्या जागेवर रोजगाराच्या संधीच नाही, अशा ठिकाणी चुकूनही जाण्याचं धाडस करू नका, कारण जिथे रोजगार उपलब्ध नाही, जिथे तुमच्या मेहनतीचं, तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य मोबदला मिळणार नाही, अशा ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?