AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : यशस्वी लोकं या पाच कामांना कधीच विलंब करत नाहीत, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की जे लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात, ते लोक कधीही पाच गोंष्टीमध्ये विलंब करत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : यशस्वी लोकं या पाच कामांना कधीच विलंब करत नाहीत, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 9:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य म्हणतात यश मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही. ज्या प्रमाणे स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी होतात, परंतु त्यातील एक जणच विजेता असतो. तो इतर खेळांडूपेक्षा काहीतरी वेगळं करतो, म्हणून तो ती स्पर्धा जिंकतो. त्याचप्रमाणे यशाचं देखील आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळा विचार कराल तेव्हाच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. नुसतं यश मिळून देखील चालत नाही तर ते तुम्हाला टिकवता देखील आलं पाहिजे असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्नात सातत्य या दोन गोष्टींची जशी आवश्यकता असते, तशीच आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे योग्य दिशेची तुमची दिशाच जर नक्की नसेल तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जे यशस्वी लोक असतात, ते पाच गोष्टींमध्ये कधीच विलंब करत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नियोजन – चाणक्य म्हणतात जे लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी असतात, असे लोक जेव्हा एखादी गोष्ट ठरवतात, तिचे नियोजन करतात त्यानंतर हे नियोजन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी कधीही विलंब करत नाहीत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याकडे त्यांचा ओढा असतो, ते कधीही कामात टाळाटाळ करत नाहीत, म्हणूनच अशी लोक यशस्वी होतात. ते केवळ यशस्वीच होत नाहीत, तर हे यश ते कायम टिकवून देखील ठेवतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत. यशस्वी लोक कधीही आळस करत नाहीत. ते आजचं काम कधीही उद्यावर ढकलत नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात यश प्राप्त होतं. त्यामुळे आजची कामं आजच केली पाहिजेत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिकण्याची प्रक्रिया – चाणक्य म्हणतात जे लोक यशस्वी असतात, असे लोक सतत नवीन गोष्टी शिकत असतात, ते सतत आपल्याला अद्ययावत ठेवत असतात, ते कधीही शिकण्याचा कंटाळा करत नाहीत, ते नेहमी नवीन गोष्टी समजून घेतात, म्हणून ते जगाच्या पुढे चार पाऊलं असतात.

संधीचा लाभ – चाणक्य म्हणतात या जगात ज्याला संधीचा त्वरीत लाभ घेता येतो, तोच या जगात यशस्वी होतो. त्यामुळे जे लोक नेहमी नव्या संधीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच त्वरीत त्या संधीचा लाभ घेतात असे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.

पैशांचं नियोजन – चाणक्य म्हणतात ज्याला पैशांचं नियोजन जमलं तो आयुष्यात यशस्वी होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते  ?.

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?

IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद.

IND vs ENG : रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्ड्सवर रचणार विक्रम, नाणेफेक होताच रेकॉर्डची नोंद

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे  हायकोर्टाचे आदेश.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

तुरटी म्हणजे दुसरा चमत्कारच, दाढी केल्यावर का लावली जाते? 99 टक्के लोकांना माहितीच नाही कारण!.

तुरटी म्हणजे दुसरा चमत्कारच, दाढी केल्यावर का लावली जाते? 99 टक्के लोकांना माहितीच नाही कारण!