AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात […]

hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी
| Updated on: Jul 20, 2022 | 2:20 PM
Share

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात शिवाची पूजा केली जाते. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते. हरियाली अमावस्येची तिथीही निसर्गाशी संबंधित असल्याचे मानले जाते. कारण यावेळी पावसामुळे सगळीकडे हिरवळ असते. यावेळी निसर्ग आपल्या सुंदर रुपात दिसतो. प्राचीन काळी हरियाली अमावस्येच्या दिवशी दंगल, जत्रा इत्यादी अनेक विशेष कार्यक्रम होत असत. चला जाणून घेऊया हरियाली अमावस्येचे महत्त्व काय आहे आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत.

मुहूर्त

पंचांगानुसार दीप अमावस्या बुधवार 27 जुलैच्या रात्री 09:11 पासून सुरू होईल आणि गुरुवार, 28 जुलैच्या रात्री 11:24 पर्यंत राहील. दुसरीकडे, 28 जुलै रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी व्रत ठेवणे खूप शुभ आहे. या दिवशी पुनर्वसु नक्षत्र सकाळी 7:05 पर्यंत आणि नंतर पुष्य नक्षत्र असल्यामुळे दोन शुभ योग तयार होणार आहेत. तर दुसरीकडे गुरु पुष्याच्या शुभ योगामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

महत्त्व

दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्यास ग्रह दोष दूर होतात. अमावस्या तिथी देखील पूर्वजांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आर्यमांना पूर्वजांमध्ये प्रमुख मानले जाते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की ते स्वतः पूर्वजांपैकी मुख्य आर्यम आहेत. दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने पूर्वजांचे समाधानही होते, म्हणजेच या दिवशी झाडे लावून निसर्ग आणि माणूस दोघेही समाधानी राहून मनुष्याला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात. दीप अमावस्येच्या या महत्त्वामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.