AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात […]

hariyali Amawashya: 28 जुलैला आहे दीप अमावस्या, मुहूर्त, महत्त्व आणि विधी
| Updated on: Jul 20, 2022 | 2:20 PM
Share

यावेळी 28 जुलै रोजी दीप अमावस्या (Deep Amawashya) येत आहे. दीप अमावास्येला हरियाली अमावस्या (Hariyali Amawasya) देखील म्हणतात.  या अमावस्येचे महत्त्व पुराणात सांगितले आहे. उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाल्याने याला श्रावण अमावास्या म्हणतात तर महाराष्ट्रीयन लोकांसाठी ही आषाढी अमावास्या आहे. यानंतर मराठी श्रावण महिन्यास सुरुवात होते. असे मानले जाते की हरियाली अमावस्येला पितृ रुपात शिवाची पूजा केली जाते. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते. हरियाली अमावस्येची तिथीही निसर्गाशी संबंधित असल्याचे मानले जाते. कारण यावेळी पावसामुळे सगळीकडे हिरवळ असते. यावेळी निसर्ग आपल्या सुंदर रुपात दिसतो. प्राचीन काळी हरियाली अमावस्येच्या दिवशी दंगल, जत्रा इत्यादी अनेक विशेष कार्यक्रम होत असत. चला जाणून घेऊया हरियाली अमावस्येचे महत्त्व काय आहे आणि त्याची खास वैशिष्ट्ये काय आहेत.

मुहूर्त

पंचांगानुसार दीप अमावस्या बुधवार 27 जुलैच्या रात्री 09:11 पासून सुरू होईल आणि गुरुवार, 28 जुलैच्या रात्री 11:24 पर्यंत राहील. दुसरीकडे, 28 जुलै रोजी उदया तिथी असल्याने या दिवशी व्रत ठेवणे खूप शुभ आहे. या दिवशी पुनर्वसु नक्षत्र सकाळी 7:05 पर्यंत आणि नंतर पुष्य नक्षत्र असल्यामुळे दोन शुभ योग तयार होणार आहेत. तर दुसरीकडे गुरु पुष्याच्या शुभ योगामुळे या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

महत्त्व

दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्यास ग्रह दोष दूर होतात. अमावस्या तिथी देखील पूर्वजांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आर्यमांना पूर्वजांमध्ये प्रमुख मानले जाते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की ते स्वतः पूर्वजांपैकी मुख्य आर्यम आहेत. दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने पूर्वजांचे समाधानही होते, म्हणजेच या दिवशी झाडे लावून निसर्ग आणि माणूस दोघेही समाधानी राहून मनुष्याला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात. दीप अमावस्येच्या या महत्त्वामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.