AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक तंगी सोडत नसेल पाठ तर, या मंदिरात जाऊन नाणे करा अर्पण

भारतामध्ये अशी अनेक मंदिर आहे ज्याचा चमत्कारांशी संबंधित कथा जगभर प्रसिद्ध आहे. जाणून घेऊ अशाच एका मंदिराबद्दल ज्या मंदिरात गेल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच अशी मान्यता आहे की या कुबेर मंदिरात गेल्यावर गरिबी नष्ट होते. जाणून घेऊ कुठे आहे ते मंदिर आणि त्याची माहिती.

आर्थिक तंगी सोडत नसेल पाठ तर, या मंदिरात जाऊन नाणे करा अर्पण
| Edited By: | Updated on: Jan 12, 2025 | 6:41 PM
Share

भारताला मंदिरांचा देश म्हटले जाते. भारतातील मंदिराची रहस्य आणि चमत्कारांच्या कथा लोकप्रिय आहेत. तर काही श्रद्धा आणि विश्वासामुळे जगभरात लोकप्रिय झाल्या आहे. असेच एक मंदिर धनाचा देव कुबेर यांचे आहे. या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याने माणसाची गरिबी पूर्णपणे नष्ट होते अशी लोकांच्या श्रद्धा आहे. याशिवाय या मंदिरामध्ये नाणे अर्पण करण्यासोबतच इतरही अनेक परंपरा आहे.

कुठे आहे हे मंदिर?

धनाचे देव म्हणून ओळख असलेले कुबेराचे हे मंदिर देवभूमी उत्तराखंड मधील अल्मोडा इथून 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर जागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. गरिबीतून मुक्तता मिळवण्यासाठी येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

मंदिराचा इतिहास

धनाचा देव कुबेराचे हे मंदिर जागेश्वर धाम येथे असलेल्या 125 मंदिर समूहां पैकी एका मध्ये आहे. हे भारतातील आठवे कुबेर मंदिर आहे. हे मंदिर ९ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. कुबेराचे हे मंदिर प्राचीन मंदिर आहे. हे भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. कुबेर या मंदिरात शिवलिंगामध्ये शक्ती रूपात विराजमान आहेत.

गरिबी नष्ट होते

एखाद्या व्यक्तीवर कुबेर देवाची कृपा असेल तर त्याला धन, कीर्ती आणि यश हे सर्व प्राप्त होते असे म्हटले जाते. या मंदिरात दररोज लोक आपल्या अनेक इच्छा घेऊन येत असतात आणि पूजा पाठ करतात. अशी मान्यता आहे की या मंदिरात दर्शन केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभांसोबतच प्रगती होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

सोने चांदीची नाणी अर्पण करतात

कुबेराच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक सोने किंवा चांदीची नाणी अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर ते नाणे पिवळ्या कपड्यात बांधून घरी घेऊन जातात. लोकांचा असा विश्वास आहे की इथे गेल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी कुबेराला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.