AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maha Shivratri 2022 | महादेवाला बेलपत्रच का अर्पण करतात ? या मागचं कारण माहीत आहे का? जाणून घ्या रंजक माहिती

भारतात सर्वत्र शिवभक्तांकडून महा शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची (lord Shiva) विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते.

Maha Shivratri 2022 | महादेवाला बेलपत्रच का अर्पण करतात ? या मागचं कारण माहीत आहे का? जाणून घ्या रंजक माहिती
Maha-Shivratri-2022
| Updated on: Feb 21, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई :  भारतात सर्वत्र शिवभक्तांकडून महा शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराची (lord Shiva) विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. 2022 मध्ये महाशिवरात्री (Maha Shivratri 2022)मंगळवार, 1 मार्च (1 March) रोजी येत आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान भोलेनाथांची माता पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी बेलची पाने खास आकर्षण ठरते. पौराणिक कथेनुसार, एकदा देवी पार्वतीने तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि त्याचे काही थेंब मंदार पर्वतावर पडली, ज्यातून बेलाच्या झाडाचा उगम झाला. या झाडाच्या मुळांमध्ये गिरीजा, देठामध्ये महेश्वरी, शाखांमध्ये दक्षयायनी, पानांमध्ये पार्वती, फुलांमध्ये गौरीचा निवास असतो अशी मान्यता आहे. हेच कारण आहे की भगवान शिवला बेलपात्र अतिप्रिय आहे. अशा परिस्थितीत, भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या नियमांचा वापर करुन बेलाचे पान अर्पण करा.

बेलपत्र म्हणजे काय आणि ते भगवान शंकराला का अर्पण केले जाते? बिल्वपत्र किंवा बेलपत्राची तिन पाने हिंदू धर्माच्या तीन मुख्य देवतांचे प्रतिनिधित्व करते – भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव. हिंदू पौराणिक कथेनुसार, तो संपूर्ण विश्वाचा निर्माता मानला जातो. असेही मानले जाते की बेलपत्र हे भगवान शंकराचे सर्वात प्रिय पान आहे.

शिवाच्या पूजेमध्ये बेलच्या पानांचे महत्त्व त्रिकोणी आकार असलेली बेलची पाने भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचे ही प्रतिनिधित्व करतात. बेलची पाने निसर्गाने थंडपणा देतात. ते शिवाला अर्पण केल्याने तंडव करणाऱ्या शिवाला शांत करण्यास मदत होते. महाशिवरात्रीला बेलपत्रासह पूजा करणाऱ्या भाविकांना आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, असेही मानले जाते.

महाशिवरात्रीला बेलची पाने अर्पण करण्याचे महत्त्व महाशिवरात्रीला भगवान शिवाला अर्पण केल्या जाणार्‍या अत्यावश्यक वस्तूंपैकी एक म्हणजे बेलपत्र. महाशिवरात्रीला देवाला बिल्वाची पाने अर्पण करणे बंधनकारक आहे. महाशिवरात्रीला भक्त भगवान शिवाला बिल्वपत्र किंवा बेलची पाने अर्पण करतात. ही पाने महामृत्युंजयाच्या जपासह इतर शिव मंत्रांसह शिवलिंगावर अर्पण केली जातात.

शिवलिंगावर बेलची पाने अशा प्रकारे अर्पण करा 1- बेलपत्र नेहमी उलटे करून शिवाला अर्पण करावे. बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या आतील बाजूस असावा.

2- जो कोणी बेलपत्र अर्पण करतो, त्यात वज्र आणि चक्र नसावे.

3- देवाला अर्पण केलेली बेल 3 ते 11 पानांची असते. त्यामध्ये जितकी जास्त अक्षरे तितकी ती अधिक फलदायी मानली जाते ती भगवान शंकराला अर्पण केली जाते.

4- जर कधी बेलची पाने मिळत नसतील तर बेलचे झाड पाहूनच देवाचे स्मरण करावे.

5-शिवाचे नाव लिहून बेलपत्र अर्पण करावे.

6- बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की त्याची पाने कुठूनही फाटलेली नसावीत.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

आणखी वाचा :

Video | खासदार संभाजीराजेंच्या गाडीचं स्टेअरींग महिलेच्या हाती! Viral व्हिडीओमागचा इंटरेस्टिंग किस्सा

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.