AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय, असा मिळेल दिलासा…

Kaal Sarp Dosh: कालसर्प योग असलेल्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्योतिष्यांच्या सल्लानंतर अनेक जण यासाठी वेगवेगळे उपाय करतात. तुम्हालाही अशीच अडचण असेल तर तुम्ही नागपंचमीला एक उपाय करू शकता. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय, असा मिळेल दिलासा...
कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय
| Updated on: Jul 26, 2025 | 4:21 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत काही ना काही दोष असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी हातातोंडाशी आलेला घासही व्यवस्थित खायला मिळत नाही. कालसर्प दोष हा एक असाच दोष आहे. हा दोष सर्वात घातक मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतात. कालसर्प योगामुळे आर्थिक, शारीरिक, शैक्षणिक आणि मुलांशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. पण तुम्हाला या कालसर्प योगातून दिलासा हवा असेल तर नागपंचमीला एक रामबाण उपाय करू शकता. चला जाणून घेऊयात उपाय

कालसर्प दोष निवारणासाठी उपाय

कालसर्प दोष निवारण करण्यासाठी सर्वात सरळ आणि सोपा उपाय म्हणजे पूजा करणे. ज्योतिषशास्त्रानुसार, कालसप्र दोष जितका जुना तितका अधिक घातक ठरतो. यासाठी हा दोष दूर करण्यासाठी पूजा करणं आवश्यक आहे. कालसर्प दोष दूर करण्यासाठी मंत्र जप, शिवलिंगावर दुधाभिषेक, महादेवाच्या मंदिरात पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. पण यातून सुटका काही होत नाही. हा दोष कायमचा दूर करण्यासाठी कालसर्प दोष निवारण पूजा करणं एकमेव उपाय आहे.

कालसर्प दोष निवारण पूजा

कालसर्प दोष निवारण पूजा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते. कारण सापांचा निवास हा महादेवांच्या गळ्यावर आहे. कालसर्प दोष निवारण पूजा केल्यानंतर एकाच दिवसात तु्म्ही या दोषातून मुक्त होऊ शकतात. भारतात अनेक ठिकाणी कालसर्प दोष निवारणासाठी पूजा केली जाते. नाशिकचं त्र्यंबकेश्वर, उज्जैनचं महाकाल मंदीर यासाठी उचित मानलं गेलं आहे. कारण या ठिकाणी भगवान शिवांचा वास आहे. हा पूजा पाठ तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केला तर त्याचं आणखी चांगलं फळ मिळू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा