AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय, असा मिळेल दिलासा…

Kaal Sarp Dosh: कालसर्प योग असलेल्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्योतिष्यांच्या सल्लानंतर अनेक जण यासाठी वेगवेगळे उपाय करतात. तुम्हालाही अशीच अडचण असेल तर तुम्ही नागपंचमीला एक उपाय करू शकता. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय, असा मिळेल दिलासा...
कालसर्प दोष असलेल्या व्यक्तींनी नागपंचमीला करावा एक रामबाण उपाय
| Updated on: Jul 26, 2025 | 4:21 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत काही ना काही दोष असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी हातातोंडाशी आलेला घासही व्यवस्थित खायला मिळत नाही. कालसर्प दोष हा एक असाच दोष आहे. हा दोष सर्वात घातक मानला जातो. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहतात. कालसर्प योगामुळे आर्थिक, शारीरिक, शैक्षणिक आणि मुलांशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहे. पण तुम्हाला या कालसर्प योगातून दिलासा हवा असेल तर नागपंचमीला एक रामबाण उपाय करू शकता. चला जाणून घेऊयात उपाय

कालसर्प दोष निवारणासाठी उपाय

कालसर्प दोष निवारण करण्यासाठी सर्वात सरळ आणि सोपा उपाय म्हणजे पूजा करणे. ज्योतिषशास्त्रानुसार, कालसप्र दोष जितका जुना तितका अधिक घातक ठरतो. यासाठी हा दोष दूर करण्यासाठी पूजा करणं आवश्यक आहे. कालसर्प दोष दूर करण्यासाठी मंत्र जप, शिवलिंगावर दुधाभिषेक, महादेवाच्या मंदिरात पूजा केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. पण यातून सुटका काही होत नाही. हा दोष कायमचा दूर करण्यासाठी कालसर्प दोष निवारण पूजा करणं एकमेव उपाय आहे.

कालसर्प दोष निवारण पूजा

कालसर्प दोष निवारण पूजा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते. कारण सापांचा निवास हा महादेवांच्या गळ्यावर आहे. कालसर्प दोष निवारण पूजा केल्यानंतर एकाच दिवसात तु्म्ही या दोषातून मुक्त होऊ शकतात. भारतात अनेक ठिकाणी कालसर्प दोष निवारणासाठी पूजा केली जाते. नाशिकचं त्र्यंबकेश्वर, उज्जैनचं महाकाल मंदीर यासाठी उचित मानलं गेलं आहे. कारण या ठिकाणी भगवान शिवांचा वास आहे. हा पूजा पाठ तुम्ही नागपंचमीच्या दिवशी केला तर त्याचं आणखी चांगलं फळ मिळू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.