AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात बांबूचं रोप असणं शुभ की अशुभ? पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?

वास्तुशास्त्रानुसार असे काही झाडं, रोपं असतात, जी घरात ठेवणं अशुभ असतात, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. तर या उलट काही असे रोपं देखील असतात जे घरात लावणं शुभ मानलं जातं, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात, आज आपण बांबूच्या रोपाबद्दल माहिती घेणार आहोत.

Vastu Shastra : घरात बांबूचं रोप असणं शुभ की अशुभ? पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 13, 2025 | 8:00 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, जी घरात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये काही वास्तूदोष निर्माण झाले असतील तर ते देखील दूर होतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुळशीचं झाड, तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं सर्वात प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद असतो. अशा घरात कधीही पैशांची कमी राहत नाही. त्याचप्रमाणे मनी प्लांटचं देखील आहे, मनी प्लांटच्या रोपाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये देखील महत्त्व आहे. हे झाड घरात लावल्यास पैसा घराकडे आकर्षित होतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हे झाडं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु कोणतंही झाडं लावताना त्याची दिशा लक्षात घेणं हे देखील वास्तुशास्त्रानुसार खुप महत्त्वाचं असतं, तरच अपेक्षित परिणाम साध्य होतो.

परंतु वास्तुशास्त्रामध्ये अशी देखील काही झाडं सांगण्यात आली आहेत, जी घरात लावणं अत्यंत अशुभ मानलं जातं. जसं की कोणतंही काटेरी झाड घरात नसू नये, जर तुम्ही गुलाब वगळता कोणतंही काटेरी झाडं घरात लावलं तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरावर आर्थिक संकट येतात. काहीही कारण नसताना भांडण होतात. त्यामुळे घरात कधीही काटेरी झाडं न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, आज आपण जाणून घेणार आहोत, घरात बांबूचं झाडं लावणं शुभ आहे की अशुभ?

वास्तुशास्त्रानुसार घरात बांबूचे झाडं लावणं शुभ मानण्यात आलं आहे. कारण बांबू हा वृक्ष पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी या सर्वांचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे घरात बांबूच रोप लावणं शुभ मानलं जातं, शक्यतो बांबूचं रोप हे पाण्यात लावावावं, घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला हे रोप लावणं शुभ मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.