AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वास्तू दोष दूर करायचा, हे उपाय करा, घरात सदैव नांदेल लक्ष्मी

घर बांधताना सर्व दिशा आणि तत्वांची काळजी घेतली नाही तर वास्तुदोष घरात प्रवेश करतो. वास्तुदोषानंतर घरात आर्थिक समस्या येऊ लागतात. तर आज आम्ही काही सामान्य उपाय सांगत आहोत ज्यामुळे वास्तुदोष दूर होतील.

वास्तू दोष दूर करायचा, हे उपाय करा, घरात सदैव नांदेल लक्ष्मी
| Edited By: | Updated on: Dec 01, 2024 | 2:11 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना तत्वांचा आणि दिशांचा सुसंवाद असावा. जर वास्तुनुसार असे झाले नाही तर घरात वास्तुदोष येतो. घरात वास्तुदोष आला तर त्याचे खूप वाईट परिणाम घरातल्या व्यक्तींवर तसेच कामांवर होतो. अशाने आर्थिक नुकसान देखील होत असते. वास्तुदोषामुळे घरात मानसिक आणि धार्मिक कलह निर्माण होऊ लागतात. याशिवाय घरात अशांतता निर्माण होते.

वास्तुदोषाचे कारणे?

आपल्या घरातील स्वयंपाकघर, शौचालय, बेडरूम, देवघर या महत्वाच्या गोष्टी योग्य दिशेला न बांधल्याचे सुद्धा ही वास्तुदोषाची प्रमुख कारणे आहेत. अशा तऱ्हेने जेव्हा घर बांधलं जातं तेव्हा तुम्ही वास्तुशास्त्र यांच्या नुसार घराची योग्य रचना विचारून कोणत्या दिशेला काय आले पाहिजे हे जाणून घेणे तितकेच महत्वाचं आहे. त्यात तुम्ही या गोष्टींची काळजी न घेतल्यास तसेच घर उभारले तर वास्तू दोष लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वास्तूदोष न लागण्याचे सोपे उपाय सांगत आहोत.

– काही लोकं कोणताही विचार न करता घरात चुकीच्या दिशेला आरसे लावतात अशा वेळी आपण आरसा योग्य ठिकाणी लावला पाहिजे. कारण आरशातून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही वेगाने वाढतात. त्यामुळे चुकीच्या दिशेला आरसा लावायला विसरू नका.

– घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात पितळ, चांदी किंवा तांबे जसे की श्रीयंत्र किंवा वास्तुयंत्र ठेवावे. घरात पिरॅमिड ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. जेव्हा तुम्ही या वस्तू घरात ठेवता तेव्हा त्या योग्य दिशेला ठेवा, असे केल्याने वास्तुदोष दूर होतात.

– आपल्या घरात तुळस, मनी प्लांट किंवा बांबू सारखी रोपे लावा. असे मानले जाते की ही रोपे लावल्याने घरात सकारात्मक उर्जा संचारते. या वनस्पती पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. याशिवाय घराला रंग काम करताना भिंतींना प्रकाश आणि मानसिक शांती देणारे रंग निवडा.

– वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील निरुपयोगी आणि तुटलेल्या वस्तू ठेवू नका. अशा गोष्टी लवकरात लवकर घरातून काढून टाका. याशिवाय तुमच्या घरातील ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा. तसेच घरात दररोज अगरबत्ती, धूप लावून कापूर जाळावा असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष मुक्त होतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.