AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips: घराच्या बाहेर गणपतीचा फोटो लावणे योग्य की अयोग्य? वास्तूशास्त्र काय सांगते?

धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

Vastu Tips: घराच्या बाहेर गणपतीचा फोटो लावणे योग्य की अयोग्य? वास्तूशास्त्र काय सांगते?
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 22, 2023 | 3:11 PM
Share

मुंबई, वास्तुशास्त्रात (Vastu tips) घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला पाहिजे. वास्तूशास्त्राच्या दृष्टीनेदेखील याला विशेष महत्व आहे. बऱ्याचदा वास्तूदोष दुर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर देवी देवतांचे फोटो लावण्याचा सल्ला देण्यात येतो, मात्र प्रत्येकच देवी देवतांचे फोटो घराच्या मुख्य दारावर लावणे योग्य मानले जात नाही.  म्हणूनच वास्तूनुसार काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात. परंतु अनेकजण आपल्या घराच्या मुख्य दारात बाहेरील आणि आतील बाजूस गणेशाची मूर्ती किंवा फोटो चिकटवतात  पण वास्तुशास्त्रात याच्या उलट असल्याचे मानले जाते.

गणपतीची मुर्ती आणि वास्तूशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर बाहेर  गणेशाची मुर्ती किंवा फोटो लावणे योग्य मानले जात नाही. मानले जात नाही. अनेक वेळा लोकांना असे वाटते की मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही स्थिती चुकीचे आणि अशुभ परिणाम देणारी मानली जातात. त्यामुळे ही चुक अवश्य टाळावी.

मुख्य दरवाजावर चुकूनही गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावू नये. द्वारपालाची भूमिका घराच्या मुख्य दारात असल्याने बाप्पाचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे हा त्यांचा अपमान समजला जातो. याशिवाय बाथरूम किंवा टॉयलेटला जोडल्या जाणाऱ्या भिंतीवर गणपतीचे चित्र कधीही लावू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच गणपतीची पूजा घरात म्हणजेच देवघरात करावी.

आर्थीक सुबत्ता लाभण्यासाठी काही उपाय

  1. खोल्यांचा रंग- वास्तुशास्त्रानुसार खोलीच्या पूर्व दिशेला हलका निळा रंग निवडा. उत्तरेला हिरवा, पूर्वेला पांढरा, पश्चिमेला निळा आणि दक्षिणेला लाल रंग निवडावा.असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
  2. जलाशयाची दिशा- वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा नळ उत्तर, ईशान्य दिशेला ठेवा. घराच्या दक्षिण, आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवा. या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने पैसा मिळतो.
  3. तिजोरी ठेवण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तिजोरी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवावा. असे केल्याने धनलाभ होण्याचे योग आहेत.
  4. घर व्यवस्थित ठेवा- घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. देवी लक्ष्मीचा वास स्वच्छ ठिकाणीच असतो. वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा व्यवस्थित ठेवावी. असे केल्याने घरात धनसंपत्ती वाढते असे म्हणतात.
  5. घराचे दरवाजे किंवा खिडक्या – वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे किंवा खिडक्या स्वच्छ ठेवाव्यात. असे म्हटले जाते की, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.