AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घराच्या अंगणात कधीच असू नयेत ही 2 झाडं; आयुष्य बरबाद होईल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं असतात जी घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु अशी देखील काही झाडं असतात जी घरात असता कामा नये, अशा झाडांमुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastushastra : घराच्या अंगणात कधीच असू नयेत ही 2 झाडं; आयुष्य बरबाद होईल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 27, 2026 | 8:33 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतील, झाडं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अशा गोष्टी तुमच्या घरातील ऊर्जा नियंत्रणाचं काम करतात. जसं की काही वस्तू, मूर्ती, झाडं हे घरात ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं, कारण या सर्व गोष्टींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे ऊर्जा संतुलन साधलं जातं. ज्या घरात ऊर्जेचं योग्य संतुलन असतं त्या घरात आर्थिक स्थैर्य, सुख, शांती आणि समृद्धी असते. त्यामुळे घरातील ऊर्जा संतुलन महत्त्वाचं असतं, परंतु वास्तुशास्त्रात अशी काही झाडं सांगण्यात आले आहेत, ही झाडं जर तुमच्या घराच्या अंगणात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. परिणामी तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, वास्तुदोष तयार होतो. ज्या घरात वास्तुदोष असतो, त्या घरातील कुटुंब प्रमुखाच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे अशी झाडं घराच्या अंगणात नसावीत असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.

बोरीचं झाडं – वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या अंगणात कधीही बोरीचं झाडं असू नये. बोरीचं झाडं घरात असणं हे अतिशय अशुभ मानलं जातं. कारण बोरीचं झाडं हे काटेरी असतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरासमोर किंवा घराच्या अंगणात जर बोरीचं झाडं असेल तर त्यामुळे तुमच्या घरात प्रवेश करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येऊ शकतता. एवढंच नाही तर जर तुमच्या घराच्या समोर बोरीचं झाडं असेल तर ते अशुभ मानलं जातं, कारण त्यामुळे काहीही कारण नसताना तुमच्या घरात सतत भांडणं होतात, पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा येतो, त्यामुळे घराच्या अंगणात बोरीचं झाडं असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

बाभळीचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोर कधीही बाभळीचं झाडं असू नये, जर घराच्या अंगणात किंवा घरासमोर बाभळीचं झाडं असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजारपण वाढतं. आरोग्याच्या समस्या निर्माण होतातय तसेच अनावश्यक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे हातात पैसा टिकत नाही. घरावर आर्थिक संकटं येतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, त्यामुळे घरात कधीही बोरीचं आणि बाभळीचं झाड असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....