AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय…

हिंदू धर्माच्या ग्रंथात असे वर्णन केले आहे की या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अन्याय वाढला आहे (Lord Vishnu As Kalki Avtar), तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रकट झाले आहेत.

Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय...
Kalki Avtar
| Updated on: Apr 15, 2021 | 10:45 AM
Share

मुंबई : हिंदू धर्माच्या ग्रंथात असे वर्णन केले आहे की या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप आणि अन्याय वाढला आहे (Lord Vishnu As Kalki Avtar), तेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर वाईट लोकांचा नाश करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रकट झाले आहेत. वामन अवतार, नरसिंह अवतार, मत्स्य अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार हे सर्व रुप याचे वास्तव पुरावे आहेत (When Will Lord Vishnu Take A Birth As Kalki Avtar Know Everything About It).

शास्त्रात विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे, त्यापैकी त्यांनी आत्तापर्यंत नऊ अवतार घेतले आहेत. परंतु कलियुगातील त्यांचा अखेरचा अवतार अद्याप बाकी आहे. असे मानले जाते की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा विष्णू कल्कीचा अवतार घेतील आणि कलियुग संपवून धर्मयुग स्थापन करतील.

कल्की अवतार आजही लोकांसाठी एक गूढ आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भगवान विष्णू आपला कल्की अवतार कधी घेतील, कुठे घेतील, त्याचे रुप काय असेल, त्यांचे वाहन काय असेल, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भगवद्गीतेत आहेत.

भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की, जेव्हा-जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म आणि पापाचे वर्चस्व होते, तेव्हा ते धर्म स्थापनेसाठी अवतार घेतील.

श्रीमद् भगवद पुराणातील बाराव्या स्कंदात असे लिहिले आहे की, भगवान कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधीकाळात घेतील. धर्मग्रंथानुसार भगवान राम आणि श्री कृष्ण यांचा देखील अवतार त्यांच्या संबंधित युगाच्या शेवटी झाला होता. म्हणूनच, कलियुगाचा अंत जवळ आल्यावर भगवान कल्कीचा जन्म होईल.

शास्त्रात कल्की अवतार संबंधित श्लोकाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की कलियुगात देवाचा कल्की अवतार केव्हा आणि कोठे असेल आणि त्याचे वडील कोण असतील?

सम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणास्यमहात्मन। भगवनविष्णुयशसः कल्कि प्रादुर्भाविष्यति।।

अर्थात, भगवान कल्की यांचा जन्म संभळ गावात विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रुपात होईल. देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील, तेव्हाच सत्ययुग प्रारंभ होईल. भगवान विष्णूचा कल्की अवतार मिस्सकलंक अवतार म्हणूनही ओळखला जाईल. या अवतारात, त्यांच्या आईचे नाव सुमती असेल. याव्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही असतील. ते सुमंत, प्राज्ञ आणि कवि म्हणून ओळखले जातील. यज्ञवल्क्य हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील. भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रुपी पद्मा आणि वैष्णवी रुपी रमा अशा दोन पत्नी असतील. त्यांची मुले जय, विजय, मेघमाल आणि बलाहक असतील.

पुराणात असे सांगितले गेले आहे की, कलियुगाच्या शेवटी हे अवतार होतील आणि ते अधर्मींचा अंत करुन पुन्हा एकदा धर्माचे राज्य स्थापित करतील.

सध्या कलियुगाचा अजूनही थोडा वेळ बाकी आहे. त्यामुळे हा अवतार होण्यासाठी बराच वेळ आहे. आता आम्ही आणि आपण फक्त पृथ्वीच्या उन्नतीसाठी कल्की देव जन्माला येईल याची प्रतिक्षा करु शकतो.

When Will Lord Vishnu Take A Birth As Kalki Avtar Know Everything About It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Saptarshi | सप्तर्षी म्हणजे काय, ते किती प्रकारचे असतात? जाणून घ्या…

BhimKund | या कुंडात पाणी येतं कुठून, वैज्ञानिकही आजपर्यंत शोधू शकले नाही याचा स्त्रोत, जाणून घ्या भीमकुंडाबाबत सर्व माहिती

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.