AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यज्ञात आंब्याच्या झाडाच्या खोडांचा का केला जातो वापर? असे आहे शास्त्रीय कारण

कोणत्याही कारणास्तव यज्ञ केले जात असले तरी सर्व साहित्य फक्त आंब्याच्या लाकडात मिसळले जाते. आंब्याच्या लाकडात धूप, देवदार, कापूर, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन, लोबान, अक्षत आणि फुले मिसळून यज्ञ केला जातो.

यज्ञात आंब्याच्या झाडाच्या खोडांचा का केला जातो वापर? असे आहे शास्त्रीय कारण
यज्ञImage Credit source: social Media
| Updated on: Jun 29, 2023 | 3:11 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात जेव्हा एखादे शुभ कार्य केले जाते तेव्हा  यज्ञ अवश्य केला जातो. तुम्हीसुद्धा एखादा यज्ञ अवश्य केला असेल किंवा त्या सहभागी तरी अवश्य झाला असाल. एखादे विशेष यज्ञ (Importance Of Hawan) करतांना शास्त्रात सांगीतलेल्या काही पवित्र झाडांचे लाकुड किंवा खोड वापरण्यात येते. मात्र सर्वसाधारण यज्ञ करताना त्यात फक्त फक्त आंब्याचे लाकूड  वापरले जाते. यज्ञात आंब्याच्या झाडाचे खोड वापरण्यामागचे  कारण जाणून घेऊया.

आंब्याचे लाकूड कशाचे प्रतीक आहे?

हिंदू धर्मात आंब्याचे लाकूड शुद्धता, प्रजनन आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते. या कारणास्तव, यज्ञासारख्या महत्त्वाच्या विधीसाठी या लाकडांचा वापर केला जातो. यज्ञात आंब्याच्या लाकडाचा वापर केल्याने नववधू-वरांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

शास्त्रात यज्ञाचे महत्व

कोणत्याही कारणास्तव यज्ञ केले जात असले तरी सर्व साहित्य फक्त आंब्याच्या लाकडात मिसळले जाते. आंब्याच्या लाकडात धूप, देवदार, कापूर, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन, लोबान, अक्षत आणि फुले मिसळून यज्ञ केला जातो. शास्त्रानुसार असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच ज्या ठिकाणी यज्ञ केले जाते तेथे सकारात्मक ऊर्जा वास करते.

याचे शास्त्रीय कारणही जाणून घ्या

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार आंब्याच्या लाकडातून कार्बन डायऑक्साइड इतर लाकडाच्या तुलनेत कमी प्रमाणात सोडला जातो. तसेच ते अधिक ज्वलनशील आहे. संशोधनात असेही आढळून आले आहे की आंब्याचे लाकूड जाळल्याने व्हॉल्यूमिक अॅल्डिहाइड नावाचा वायू बाहेर पडतो, ज्यामुळे अनेक प्रकारचे जीवाणू आणि जीवाणू नष्ट होतात आणि वातावरणही शुद्ध होते. शुद्धतेमुळे हवनात आंब्याच्या लाकडाचा वापर केला जातो. ही गोष्ट धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही कारणांनी सिद्ध झाली आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.