Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?

बरेच वृद्ध कल्की अवताराबद्दल वेगवेगळे किस्से सांगत आहेत आणि या भीतीच्या वातावरणामध्ये कल्की अवताराबद्दल बरीच चर्चा होत आहे (Bhagvan Vishnu Kalki Avtar).

Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?
Kalki Avtar And Corona
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 1:26 PM

मुंबई : कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे आणि ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे (Bhagvan Vishnu Kalki Avtar). तसेच, देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूमुळे आलेलं संकटे, तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की, आता कल्की अवताराची वेळ जवळ आली आहे. बरेच वृद्ध कल्की अवताराबद्दल वेगवेगळे किस्से सांगत आहेत आणि या भीतीच्या वातावरणामध्ये कल्की अवताराबद्दल बरीच चर्चा होत आहे (Why Bhagvan Vishnu Kalki Avtar Is In Discussion During This Corona Virus Pandemic Situation).

त्याचबरोबर लोकांना कल्की अवताराच्या चर्चेमुळे सर्वकाही संपण्याची भीती देखील आहे. अशा परिस्थितीत हा कल्की अवतार काय आहे आणि या काळात लोक याबद्दल का बोलत आहेत आणि का घाबरले आहेत. कल्की अवतार आणि या संकल्पनेशी संबंधित काही माहिती जाणून घेऊ.

कल्की अवतार काय आहे?

मान्यता आहे की, भगवान विष्णूचा आणखी एक अवतार होणार आहे, ज्याला आपण कल्की अवतार म्हणतो. हा भगवान विष्णूचा अवतार आहे, ज्याला कलियुगचा देव म्हणून देखील ओळखले जाते. असे म्हणतात की, कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेतील. कलियुगाच्या अंतिम कळात कल्की अवतार पृथ्वीवर अवरित होईल, त्यानंतर पापांचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाची सुरुवात होईल.

यावेळी कल्की अवताराची चर्चा का?

हिंदू धर्मात चार युगांचा उल्लेख आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. असे म्हणतात की, आता कलियुग सुरु आहे आणि शेवटी कल्कीचा अवतार होईल. असेही म्हटले जाते की कल्कीचा अवतार अशा वेळी होईल जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल आणि सर्वत्र हाहाकार माजेल. यानंतर, भगवान कल्कीचा अवतार होईल, म्हणजेच भगवान विष्णू पृथ्वीवर येऊन पापींचा नाश करतील. यानंतर, कलियुग संपेल आणि पुन्हा एक नवीन युग सुरु होईल.

साध्या पद्धतीने सांगायचं झालं तर, कलियुगाच्या समाप्तीने सर्व काही संपेल आणि आता सर्वकाही समाप्त होण्याची वेळ आली आहे. बर्‍याच ठिकाणी याचा उल्लेख आहे की चार युग पुन्हा पुन्हा येतात आणि आता कलियुग संपणार आहे.

शास्त्रांमध्ये विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख असल्याचेही मानले जाते, त्यापैकी त्यांनी आतापर्यंत नऊ अवतार घेतले आहेत. परंतु कलियुगात ते अद्याप त्यांचा अखेरचा अवतार झालेला नाही. मान्यता आहे की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेतील आणि कलियुग संपवून धर्मयुग स्थापित करतील.

जाणकार काय सांगतात?

एपिक चॅनल्सच्या मालिकेत देवदत्त पट्टानायक यांनी कल्कीबाबत सांगितले आहे की, वेगवेगळ्या परंपरेत त्यांना एक तारणहार म्हणूनही पाहिलं जात जो वाईट आणि पापींपासून जगाला वाचवेल, सर्व काही नष्ट करेल आणि एक नवीन समाज निर्माण करेल. त्याचप्रमाणे असे म्हणतात की भगवान विष्णू कल्कीच्या रुपाने येतील आणि पुन्हा एकदा नवीन जगाचा निर्माण करतील.

Why Bhagvan Vishnu Kalki Avtar Is In Discussion During This Corona Virus Pandemic Situation

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.