AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतयात्रेच्या वेळी का म्हणतात राम नाम सत्य है? तुम्हाला माहिती आहे का या मागचं कारण?

पुढच्या जन्मी कोण कोणत्या रूपात जन्म घेईन हे कोणालाच माहीत नसते. तरीही माणूस आयुष्यभर भ्रमात गुरफटून फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो.

अंतयात्रेच्या वेळी का म्हणतात राम नाम सत्य है? तुम्हाला माहिती आहे का या मागचं कारण?
अंतयात्राImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 19, 2023 | 10:05 PM
Share

मुंबई : हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत आणि सर्व परंपरांना विशेष कारणे आणि महत्त्व जोडलेले आहे. हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या अंतिम विधी किंवा अंतिम संस्कारांसाठी एक नियम आहे. सोळा संस्कारा पैकी एक असलेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी मृत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली जाते आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला जातो. अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित असलेले नातेवाईक आणि लोकं मार्गात वारंवार ‘राम नाम सत्य है’ म्हणत असल्याचे तुम्ही पाहिले असेल पण अंत्ययात्रेदरम्यान ‘राम नाम सत्य है’ (Ram nam Satya hai)का म्हटले जाते आणि त्यामागील कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

धर्मराज युधिष्ठिर यांनी ‘रामाचे नाव खरे’ याचा अर्थ सांगितला.

महाभारताचे मुख्य पात्र आणि पांडवांमधील ज्येष्ठ धर्मराज युधिष्ठिर यांनी एका श्लोकाबद्दल सांगितले आहे. त्याचा खरा अर्थ या श्लोकातून दिसून येतो.

अहन्याहणी भूतानि गच्छन्ति यम्ममंदिरम् । शेषा विभूतिमिछन्ति किमश्चर्या मत: परम् ।

अर्थ-

महाभारतातील पांडवांचे थोरले बंधू धर्मराज युधिष्ठिर यांनी या श्लोकाचा अर्थ सांगितला की, प्रेत वाहून नेत असताना लोकं रामाचे नाव घेतात, त्यासोबत फक्त रामाचे नाव जात होते, परंतु परत आल्यावर त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य ते व्यक्तीच्या (मृत) संपत्ती आणि मालमत्तेबद्दल विचार करू लागतात. ते भांडू लागतात आणि त्याच्या मालमत्तेबद्दल हेवा वाटू लागतात. धर्मराज युधिष्ठिर पुढे म्हणाले आहेत की, “दररोज जीव मरतात, निघून गेल्यावर ते दुःखी होतात, पण शेवटी घरच्यांनाच संपत्ती हवी असते, यापेक्षा आश्‍चर्यकारक काय असेल? त्यामुळे माणसाने लोभी नसावे, त्याने त्याचे कर्म चांगले केले पाहिजे.

अंत्यसंस्कारात ‘राम नाम सत्य है’ म्हणण्याची मुख्य कारणे

अंत्यसंस्काराच्या वेळी  जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेव्हा हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना आणि जवळीकांना हे कळवाचे असते की मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही. माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यावर एकटाच जातो. शरीर नश्वर आहे आणि आत्मा या जीवनचक्रातून मुक्त होतो. सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो, म्हणून आता या मृत शरीराला काही अर्थ नाही, आणि रामाचे एकच नाव आहे जे सत्य आहे. या राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव होते.

या जगातील प्रत्येक जीव, ज्याला आत्मा आहे तो मरणार आहे. या पृथ्वीतलावर जन्माला आलेला मनुष्य आपले शरीर सोडून नवीन प्रजातीत प्रवेश करतो. पुढच्या जन्मी कोण कोणत्या रूपात जन्म घेईन हे कोणालाच माहीत नसते. तरीही माणूस आयुष्यभर भ्रमात गुरफटून फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो.

माणसाने कितीही प्रयत्न केले तरी फसवणूक केली तरी तो रिकाम्या हाताने जातो. जर तो बरोबर घेऊन गेला तर त्याची चांगली कामे लोकांच्या लक्षात राहतील. धार्मिक मान्यतेनुसार, मनुष्याला पुढील जन्मात त्याच्या कर्मानुसार याचा अनुभव येतो. माणसाने आपल्या कर्माने दुसरे काही घेतले तर ते म्हणजे ‘रामाचे नाव’. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोक मृतदेह घेऊन जाताना शेवटच्या प्रवासात फक्त ‘राम नाम सत्य है’ चा जप करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.