AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपाळावर टिळा लावताना त्यावर तांदूळ का चिकटवतात? जाणून घ्या कारण

ओवाळणी केल्यानंतर काही तांदळाचे दाणे तुमच्या डोक्यावर आणि आजूबाजूलाही फेकले जातात. पण यामागचे नेमकं कारण काय? (Why rice is applied after applying tilak)

कपाळावर टिळा लावताना त्यावर तांदूळ का चिकटवतात? जाणून घ्या कारण
tilak
| Updated on: May 21, 2021 | 2:17 PM
Share

मुंबई : एखाद्या ठिकाणी वाढदिवस, पुजा किंवा लग्नसंभारंभ यासारख्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात कपाळावर टिळा लावला जातो. अनेकदा चंदन, केशर आणि इत्यादी गोष्टींचा वापर करुन कपाळावर टिळा लावला जातो. सर्वाधिक वेळेला टीळा लावताना लाल रंगाच्या कुंकूवाचा वापर केला जातो. अनेकदा टिळा लावल्यानंतर त्यावर तांदळाचे काही दाणे लावले जातात. इतकंच नव्हे तर ओवाळणी केल्यानंतर काही तांदळाचे दाणे तुमच्या डोक्यावर आणि आजूबाजूलाही फेकले जातात. पण यामागचे नेमकं कारण काय? याची तुम्हाला माहिती आहे का? हे करण्यामागे अनेक तर्क-विर्तक कारण सांगितली जातात. यामागचे नेमकं कारण काय, चला जाणून घेऊया… (Why rice is applied after applying tilak know the reason)

धार्मिक कारण काय? 

कपाळावर टिळा लावल्यानंतर तांदूळ लावणे हा श्रद्धेचा भाग आहे. आपल्याकडे दीर्घकाळापासून ही परंपरा सुरु आहे. यामुळेच टिळा लावताना कुंकूसोबत तांदळाचाही वापर केला जातो. तर काही अहवालात दिलेल्या माहितीनुसार, तांदूळ हे सर्वात शुद्ध धान्य मानले जाते. घरातील अनेक छोट्या छोट्या विधीपासून ते मोठ्या विधीपर्यंत तांदळाला विशेष महत्त्व दिले जाते. देवाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यातही भाताला फार महत्त्व असते. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात तसेच विशेष प्रसंगी तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.

इतकचं नव्हे तर होम हवन करतेवेळी तांदूळ हे अर्पण केले जाते. तांदूळ हे शुद्ध धान्य आहे. त्यामुळेच तांदळाला अक्षता असेही म्हणतात. अक्षता म्हणजे जे कधीही नष्ट होणार नाही असे… यामुळे कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो. याच कराणामुळे टिळा लावल्यानंतर तांदळाचा वापर केला जातो. त्यासोबतच हिंदू धर्मात भात हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्याचा वापर केला जातो.

काही अन्य कारण

तसेच कपाळावर टिळा लावल्यानंतर तांदूळ लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे तांदळाचा वापर केला जातो. तसेच ओवाळणी केल्यानंतर डोक्यावर आणि आजूबाजूला तांदळाचे दाणे टाकल्याने सकारात्मक उर्जा पसरते. याच कारणामुळे तांदूळ हे कपाळावर लावण्यासोबतच आजूबाजूला फेकले जातात. (Why rice is applied after applying tilak know the reason)

संबंधित बातम्या : 

पुढच्या आठवड्यात दिसणार वर्षातील शेवटचा ‘सुपर फ्लॉवर मून’, जाणून घ्या भारतात कसे दिसेल चंद्रग्रहण

Viral Video | प्रेमासाठी वाट्टेल ते…प्रेयसीसाठी प्रियकराने आणला चक्क ‘चांद का तुकडा’, पहा प्रेमात पाडणारा हा व्हायरल व्हिडिओ

भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...