AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुजेच्या वेळी का लावला जातो कपाळावर टिळा, धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणही जाणून घ्या

यासोबतच पूजेदरम्यान देवतांना तिलकभिषेकही (Importance Of Tilak) केला जातो. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही याचे अनेक फायदे आहेत.

पुजेच्या वेळी का लावला जातो कपाळावर टिळा, धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणही जाणून घ्या
टिळा लावण्याचे महत्त्वImage Credit source: Social Media
| Updated on: May 30, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत ज्या शतकानुशतके पाळल्या जात आहेत. यामध्ये मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे, शंख फुंकणे, अगरबत्ती लावणे यांचा समावेश आहे. हिंदू धर्मात टिळा लावल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी पूर्ण होत नाही.  यासोबतच पूजेदरम्यान देवतांना तिलकभिषेकही (Importance Of Tilak) केला जातो. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्याही याचे अनेक फायदे आहेत. वास्तविक, रोजच्या पूजेच्या वेळी टिळा लावल्याने अनेक फायदे होतात. टिळा लावल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. यासोबतच तुमचे सर्व लक्ष भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न राहते. याशिवाय टिळा लावल्याने भगवंताचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे सर्व कार्य सहज सफल होतात.

जाणून घ्या कपाळावर टिळा लावण्याचे महत्त्व काय आहे?

धार्मिक शास्त्रांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, टिळक लावल्याने क्रोधित ग्रह शांत होण्यास आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास मदत होते. मान्यतेनुसार, कपाळावर टिळा लावल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अशा वेळी आपल्या श्रद्धा आणि उपासनेशी संबंधित हे तिलक लावल्याने नवग्रहांचे दोषही दूर होतात. असे मानले जाते की कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी टिळक लावावे. असे केल्याने कार्य सफल होते. यासोबतच आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

टिळा लावण्याची योग्य पद्धत कोणती?

पूजेच्या वेळी कोणत्याही देवी, देवता किंवा कुणालाही टिळा लावण्यासाठी नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेचा वापर करावा. हिंदू परंपरेनुसार कोणत्याही देवतेला नेहमी उजव्या हाताच्या अनामिकेलेने टिळा लावावा. मध्यमा आणि तर्जनी अशुभ मानली जाते. अनामिकेने टिळा लावल्यास आपल्या मनात सकारात्मक विचार येतात असे मानले जाते. यासोबतच कोणत्याही व्यक्तीने पूर्व दिशेला उभे राहून टिळा लावावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.