AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगताय ! भारतातील या गावात हनुमानाची पूजा करणे मानला जातो मोठा गुन्हा

भारतात (India) सर्वत्र तुम्हाला हनुमानजींची (Hanuman) पूजा होताना दिसतील, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक गाव आहे जिथे हनुमानजींची पूजा करणे गुन्हा मानला जातो.

काय सांगताय ! भारतातील या गावात हनुमानाची पूजा करणे मानला जातो मोठा गुन्हा
hanuman-Drongiri-parvat
| Updated on: Feb 14, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : भारतात (India) सर्वत्र तुम्हाला हनुमानजींची (Hanuman) पूजा होताना दिसतील, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक गाव आहे जिथे हनुमानजींची पूजा करणे गुन्हा मानला जातो. भगवान हनुमान पूजा मनोभावे केली जाते . ज्यांना हनुमान भक्त शक्ती, संकटमोचक, पवनपुत्र आणि बजरंगबली इत्यादी नावांनी संबोधतात . असे मानले जाते की हनुमानजीचे नाव घेतल्याने मोठा त्रास टळतो. अष्टसिद्धी आणि नऊ निधी देणारे भगवान हनुमान जी कुठेही गेले, ती सर्व ठिकाणे मोठी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. ज्याचे तत्वज्ञान आणि उपासना शुभ (lucky) मानली जाते, पण याही पलीकडे भारतात एक अशी जागा आहे जिथे हनुमानाची पूजा करणे गुन्हा मानला जातो. चला जाणून घेऊया हनुमानजींवर नाराज असलेले लोक आजही कोणत्या ठिकाणी त्यांची पूजा करत नाहीत.

येथे हनुमानजींची पूजा केली जात नाही उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या दुनागिरी या गावाबाबत अशी समजूत आहे की , हे तेच ठिकाण आहे जिथे भगवान हनुमान एकदा बेशुद्धावस्थेत असलेल्या लक्ष्मणाच्या उपचारासाठी संजीवनी घेण्यासाठी आले होते . रामायण काळात ज्या ठिकाणी हनुमानजींनी भेट दिली होती ती ठिकाणे आज तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात, परंतु या ठिकाणी येऊनही येथील लोक श्री रामाचे अनन्य भक्त आणि सेवक मानल्या जाणाऱ्या श्री हनुमानजींची पूजा करत नाहीत. या गावात तुम्हाला हनुमानजीच्या पूजेसाठी एक मंदिर दिसेल. पण या गावात तुम्हाला एकही हनुमान भक्त सापडणार नाही.

काय आहे या मागचं कारण असे मानले जाते की रामायण काळात मेघनाथाच्या बाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध झाले तेव्हा वैद्य यांनी त्यांच्या उपचारासाठी त्यांच्याकडे संजीवनी बूटीची मागणी केली होती. त्यानंतर श्री हनुमानजी संजीवनी शोध घेत हिमालय पर्वतातील या ठिकाणी आले होते. असे मानले जाते की त्यावेळी या गावातील एका महिलेने त्याला संजीवनी बुटीशी संबंधित डोंगराचा भाग दाखवला होता. पण हनुमानजींना येथील संजीवनी बूटी समजली नाही तेव्हा त्यांनी संपूर्ण पर्वताचा तो भागच घेऊन गेले या प्रकारा नंतर येथील लोक श्री हनुमानजींची पूजा करत नाहीत. आजही या गावात हनुमानजींची पूजा करणे गुन्हा मानला जातो.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Valentine’s Day | मैं अपनी फेवरेट हूं ! असंच म्हणाल, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी करुन स्वत:वर भरभरुन प्रेम करा

BeYourOwnValentine | मेरे लिए मैं काफी हू ! व्हॅलेंटाईन डे स्वतःला एकटं समजू नका , स्वत:वर भरभरुन प्रेम करा

14 February 2022 Panchang | 14 फेब्रुवारी 2022, व्हॅलेंटाईन डेचा दिवस कसा जाईल?, कोणाला होकार मिळणार, जाणून घ्या काय सांगतंय पंचांग

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.