AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma Injury Update : रोहित-शमी पुढच्या सामन्यात खेळणार का? इंजरीबद्दल महत्त्वाची अपडेट

Rohit Sharma Injury Update : भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला इंजरीचा सामना करावा लागला. दोघे खेळाडू मैदानाबाहेर गेले होते. आता त्यांच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट आहे. श्रेयस अय्यरने हा खुलासा केलाय.

Rohit Sharma Injury Update : रोहित-शमी पुढच्या सामन्यात खेळणार का? इंजरीबद्दल महत्त्वाची अपडेट
rohit sharma Mohammed ShamiImage Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2025 | 12:54 PM
Share

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बाबर आजम आऊट झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माला दुखापतीची समस्या जाणवली. रिपोर्ट्नुसार हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित 10 ओव्हर मैदानाबाहेर होता. त्यानंतर तो परत आला. कॉमेंटेटर्स म्हणाले की, फिल्डिंग दरम्यान रोहित सहज वाटला नाही. त्याशिवाय भारताच्या वेगवान गोलंदाजीच नेतृत्व करणारा मोहम्मद शमी सुद्धा अँकलच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसून आलेला. अनेकदा तो मैदानाबाहेर जाताना दिसला. आता दोघांच्या दुखापतीबद्दल अपडेट समोर आलीय.

मॅचनंतर रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल खुलासा केला. पोस्ट-मॅच प्रेजेंटेशनमध्ये रोहितला त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की, “सध्या ठीक आहे. कुठलीही अडचण नाहीय. शमीबद्दल तो काही बोलला नाही”

श्रेयस अय्यर दुखापतीबद्दल काय म्हणाला?

दुसरीकडे श्रेयस अय्यरने मॅचनंतर पत्रकार परिषदेत शमी आणि रोहितच्या दुखापतीच्या प्रश्नांवर उत्तर दिली. अय्यरने सांगितलं की, “दोन्ही खेळाडू ठीक आहेत. टीममध्ये दुखापतीची काही समस्या नाहीय. मी जे पाहिलं, त्यानुसार दोघे ठीक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मला नाही वाटत की, टीममध्ये काही इंजरी आहे”

भारतीय फॅन्स चिंतेत

रोहित आणि शमी मैदानाबाहेर गेल्यामुळे भारतीय फॅन्स चिंतेत होते. कारण टुर्नामेंटमध्ये आता महत्त्वाचे सामने बाकी आहेत. टीम इंडियाला आधी न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. टीम इंडियाच सेमीफायनलमध्ये खेळणं जवळपास निश्चित आहे. तिथे दोघांची आवश्यकता आहे. पण टीम इंडियाच्या फॅन्सनी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाहीय. कारण दोघे फिट असल्याच सहकाऱ्याने सांगितलय.

भारताचा पुढचा सामना आता काही दिवसांनी

चांगली बाब म्हणजे भारत आपला पुढचा सामना 6 दिवसांनी खेळणार आहे. टीम इंडिया दुबईत 2 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध उतरणार आहे. दोन्ही खेळाडूंनी थोडा त्रास झाला, तर त्यांच्याकडे सावरण्यासाठी मध्ये 6 दिवस आहेत. त्याशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे मॅच आधी टीमचे खेळाडू फ्रेश होतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.