AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट संयमाची ‘कसोटी’; निवृत्तीनंतर कोहली थेट कुठे पोचला ?, गुरूंकडून काय घेतला कानमंत्र ?

कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट हा अनुष्का शर्मासोबत वृंदावनच्या केली कुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. ही त्याची तिसरी भेट होती. ही भेट अतिशय गोपनीय होती.

Virat Kohli : विराट संयमाची 'कसोटी'; निवृत्तीनंतर कोहली थेट कुठे पोचला ?, गुरूंकडून काय घेतला कानमंत्र ?
विराट कोहली- अनुष्का शर्माImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 13, 2025 | 12:22 PM
Share

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, विराट कोहलीने मोठं पाऊल उचललं. तो पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील कृष्णा नगरीत पोहोचला. मंगळवारी सकाळीच त्या दोघांनी वृदांवनमधील कुंज आश्रमात जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे खाजगीत चर्चा केली. त्यानंतर दोघेही केली कुंज आश्रमात 2 तास 20 मिनिटं होतं. मंगळवारी सकाळी 7.20 च्या सुमारास विराट-अनुष्का, हे इनोव्हा कारने वृंदावनला पोहोचले.

गुरूंकडून काय घेतला कानमंत्र ?

त्यानंतर त्यांनी प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीनंतर विराट कोहली आणि अनुष्का सकाळी 9.40 वाजता वृंदावनहून परत निघाले. अतिशय गुप्तपणे पार पडलेल्या या भेटीदरम्यान विराट-अनुष्का मास्क घालून गाडीत बसले होते. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर विराट आणि अनुष्का परतले. या काळात त्यांनी आश्रमातील कामं पाहिली आणि समजून घेतली. तेथून त्यांनी प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर ते दोघेही दिल्लीला रवाना झाले. विराट कोहली आणि अनुष्काच्या भेटीचा हा कार्यक्रम पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. विराट कोहलीचा ही आश्रमातील तिसरी भेट होती.

तिसऱ्यांदा आश्रमात दिली भेट

सोमवारी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, विराट हा अनुष्कासोबत दुसऱ्या दिवशीच, मंगळवारी खाजगी टॅक्सीने वृंदावनला पोहोचला. ही त्यांची तिसरी भेट होती.यापूर्वी, विराट कोहली त्याच्या कुटुंबासह जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदाच संत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात भेट देण्यासाठी गेला होता. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात तो दुसऱ्यांदा इथे आला, तेव्हा त्यांची मुलं वामिका आणि अकायही सोबत होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची संत प्रेमानंद महाराजांवर गाढ श्रद्धा आहे.

समजून घेतलं आश्रमाचं कामकाज

मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 मिनिटे संवाद साधला आणि उर्वरित वेळेत त्यांनी आश्रमातील कामकाजाचे निरीक्षण केले. विराट अनुष्का शर्मासह सकाळी 7 वाजता प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात हित केली कुंज येथे पोहोचला. त्यानंतर, सुमारे 9.30 वाजता, ते पुन्हा इनोव्हा गाडीत बसले आणि परत गेले.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड