AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का, वनडेनंतर T20 सीरीज मधूनही स्टार खेळाडू बाहेर

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला काल पराभवाचा धक्का बसला आहे. त्यातच आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या वनडे सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने संघातील एका स्टार खेळाडूला आता टी 20 मालिकेतून देखील बाहेर पडावे लागणार आहे.

Team India : टीम इंडियाला मोठा धक्का, वनडेनंतर T20 सीरीज मधूनही स्टार खेळाडू बाहेर
टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, स्टार खेळाडू बाहेर
manasi mande
manasi mande | Updated on: Jan 15, 2026 | 8:26 AM
Share

टीम इंडिया सध्या न्युझीलंडविरोधात 3 वनडे मॅचेसची सीरिज खेळत असून त्यात दोन्ही संघांनी 1-1 सामने जिंकत मालिकेत बरोबर साधली आहे. मात्र याच सीरिजदरम्यान दुखापतीमुळे 2 खेळाडूंना टीम इंडियाच्या (Team India) बाहेर पडावे लागले. मात्र आता टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढताना दिसणार आहे. कारण वनडे नंतर एक खेळाडू आता न्युझीलंडविरुद्धच्या टी-20 स्पर्धेतूनही बाहेर पडला आहे. आगामी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आधी हाँ भारतीय संघासाठी मोठा झटका मानला जाता आहे.

T20 सीरीजमधून या खेळाडूचा पत्ता कट

भारतीय क्रिकेट संघासाठी वाईट बातमी आली आहे की, स्टार ऑलराउंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आता सध्या चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेतून तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतूनही बाहेर पडला आहे. वॉशिंग्टन सुंदर याला यापूर्वी वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात साइड स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळे त्या सामन्यात, तो फक्त 5 ओव्हर्स टाकू शकला. एवढंच नव्हे तर फलंदाजी करतानाही त्याला वेदना जाणवत होत्या. त्याला एकदिवसीय मालिकेतून वगळल्याची पुष्टी बीसीसीआयने सोमवारी (12 जानेवारी) केली. आता, याच संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे त्याची दुखापत गंभीर असून येत्या 21 जानेवारीपासून जानेवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेतही वॉशिंग्टन सुंदर हा सहभागी होऊ शकणार नाही.

मात्र त्याची ही दुखापत एवढीच नर्यादित नसून पुढील महिन्यात आगामी टी-20 वर्लडकपासाठी देखील टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. कारण वॉशिंग्टन सुंदर हा संघाचा भाग आहे आणि त्याची उपयुक्तता संघाच्या बॅलेन्ससाठी अतिशय महत्त्वाची आहे. तो त्याच्या ऑफ-स्पिन आणि शक्तिशाली फलंदाजीसाठी ओळखला जातो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना सुदंर याला ही दुखापत झाली. त्या सामन्यात त्याला न्यूझीलंडच्या डावात 27 धावा देऊन एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि नितीश कुमार रेड्डी याला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आले. तर नंतर फलंदाजीस आल्यावरही तो फक्त 7 धावा (नाबाद) करू शकला, पण धाव घेताना तो खूपच अस्वस्थ दिसत होता. सुंदरच्या स्नायूंवर ताण पडला आहे आणि स्कॅननंतर याबद्दल अपडेट मिळतली असं कॅप्टन शुभमन गिलने सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं. मात्र आता तो उर्वरित सामने आणि टी-20 सीरिजलाही मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारताच्या 3 खेळांडूना दुखापत

टीम इंडिया आधीच दुखापतींशी झुंजत आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला साइड स्ट्रेनमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले, तर तिलक वर्मा याच्यावर मांडीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो पहिल्या तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर पडला होता. आता वॉशिंग्टन सुंदर यालाही दुखापत झाली असून तो संघाबाहेर पडला असून टीम इंडियाची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल
अपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा, माणसाचा आवाज... शेतकऱ्यांची शक्कल.
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का
मनपा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का.
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा
..म्हणून आता मंदिरात वणवण फिरतायत! आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर निशाणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात.
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका
ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम! फडणवीसांची टीका.
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर
काँग्रेस जिंकते तेव्हा.... PADUच्या वादावर भाजपचं प्रत्युत्तर.
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
उद्या मतदान, अनेक भागात पैसे वाटल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?.