AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान मोठी बातमी, टीम इंडिया न्यूझीलंडला भिडणार, 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरीज

मायदेशात भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतेल.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान मोठी बातमी, टीम इंडिया न्यूझीलंडला भिडणार, 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरीज
Rahul-Hardik Image Credit source: PTI
| Updated on: Jun 28, 2022 | 1:02 PM
Share

मुंबई: ऑस्ट्रेलियामधील टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) संपताच भारतीय संघ न्यूझीलंड (India newzeland tour) दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन वनडे (Three odi) आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी ही माहिती दिली. 18 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही सीरीज आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढच्यावर्षी न्यूझीलंडचा संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी भारतात येईल. वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघ वेलिंगटन, तौरंगा आणि नेपियरमध्ये तीन टी 20 आणि ऑकलंडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडमध्ये येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. मागच्यावेळी भारताने न्यूझीलंडचा त्यांच्याच देशात टी 20 सीरीजमध्ये पराभव केला होता.

इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार

मायदेशात भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर येणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतेल. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारत शुक्रवारपासून इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळणार आहे. मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या मालिकेतील हा सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळतील.

जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघ इंग्लंडचा दौरा संपल्यानंतर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी हा दौरा होईल. पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज होणार आहे. त्यासाठी मजबूत संघ मैदानात उतरवला जाईल. त्यासाठी आयर्लंड़ दौरा हा युवा खेळाडूंकडे आपली क्षमता दाखवण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात जास्त विचार होऊ शकतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.