AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 : श्रीलंकेचा आशिया चषकाचं यजमानपद भूषवण्यास नकार, स्पर्धा भारतात की UAEमध्ये?

भारतामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात फारशी पेच राहणार नाही. तसं झाल्यास चाहत्यांना भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यासोबतच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे.

Asia Cup 2022 : श्रीलंकेचा आशिया चषकाचं यजमानपद भूषवण्यास नकार, स्पर्धा भारतात की UAEमध्ये?
Asia Cup 2022 भारतात की 'यूएई'मध्ये?Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Edited By: | Updated on: Aug 03, 2023 | 1:11 PM
Share

नवी दिल्ली :   श्रीलंका सध्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटनं (SLC) आशिया कप 2022 T20 (Asia Cup 2022) क्रिकेटचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेटनं बुधवारी आशिया क्रिकेट परिषदेला (ACC) ही माहिती दिली. तो म्हणाला की, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे तो T20 आशिया चषक आयोजित करण्याच्या स्थितीत नाही. आर्थिक संकटामुळे श्रीलंका प्रीमियर लीग (LPL) चा तिसरा टप्पाही पुढे ढकलण्यात आली आहे. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेनं म्हटलं आहे की, येथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सहा संघांची एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्याची स्थिती नाही. त्यामुळे आता ही स्पर्धा कुठे होणार, असा पेच निर्माण झालाय. यानंतर दोन देशांची नावं समोर आली आहे. ती देश होणती ते पुढे जाणून घ्या…

स्पर्धा भारतात की UAEमध्ये?

एसएलसीनं सांगितले की, ते कोणत्याही देशात ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहेत. T20 विश्वचषकापूर्वी ACC या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकाबाबत येत्या काही दिवसांत मोठी घोषणा करू शकते. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत किंवा संयुक्त अरब अमिराती (UAE) यांना या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळू शकते. एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर कोणताही देश यजमान बनू शकतो. ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ACC आणि श्रीलंका क्रिकेटला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी बोलून स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागेल.

बीसीसीआयनं काय म्हटलंय?

त्याचबरोबर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा आहेत. जय शहा हे बीसीसीआयचे सचिवही आहेत. अशा परिस्थितीत भारतामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात फारशी पेच राहणार नाही. तसं झाल्यास चाहत्यांना येथे भारत-पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. यासोबतच भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याचीही संधी आहे.

अंतिम मान्यता गरजेची

एसीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएईबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर कोणताही देश यजमान बनू शकतो. ही स्पर्धा भारतात होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ACC आणि श्रीलंका क्रिकेटला अमिराती क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी बोलून स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यांची अंतिम मान्यता घ्यावी लागेल.

आता आशिया कप 2022 नेमकी कुठे होणार. भारतात की युएईमध्ये, याची उत्सुकता लागून आहे.

Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट