AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP सामना पावसामुळे रद्द झाल्यास टीम इंडिया Asia Cup 2023 मधून बाहेर?

India vs Nepal Rain asia cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातलाय. त्यामुळे खेळ थांबवावा लागलाय.

IND vs NEP सामना पावसामुळे रद्द झाल्यास टीम इंडिया Asia Cup 2023 मधून बाहेर?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 04, 2023 | 7:07 PM
Share

पल्लेकेले | आशिया कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. नेपाळच्या सलामी जोडीने शानदार सुरुवात करुन दिली. कुशल भुरटेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने धमाकेदार सुरुवात केली. या दोघांनी 65 रन्सची भागीदारी केली. मात्र त्यानंतर नेपाळने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी नेपाळला धक्क्यावर धक्के दिले.

त्यानंतर सामन्यात 37.5 ओव्हरनंतर पावसाची एन्ट्री झाली. त्यामुळे सामना थांबवावा लागला. गेल्या अनेक मिनिटांपासून थांबला आहे. टीम इंडियाचा आशिया कप 2023 मधील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध झाला. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यात आता नेपाळ विरुद्धच्या सामन्यातही आता पावसामुळे खेळ थांबला आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द झाला तर टीम इंडिया आशिया कप 2023 मधून बाहेर होणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. असंख्य क्रिकेट चाहत्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. त्याआधी पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. तर टीम इंडियाच्या खात्यात 1 पॉइंट झाला. तर नेपाळच्या पराभवामुळे त्यांचा नेट रन रेट आणखी खराब झाला.

सामना रद्द झाल्यास काय?

टीम इंडिया विरुद्ध नेपाळ सामन्यात संध्याकाळी जवळपास 5 वाजून 45 मिनिटांनी पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे तब्बल पाऊण तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. सुदैवाने षटकं कमी करण्यात आली नाही. मात्र सामन्यात पुन्हा पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर टीम इंडियाला काहीही धोका नाही. कारण सामना रद्द झाला, तर टीम इंडियाला 1 पॉइंट मिळेल. तसंच नेपाळलाही 1 पॉइंट मिळेल. टीम इंडियाच्या 1 पॉइंट्सह आधीचा 1 पॉइंट, असे 2 पॉइंट्स होतील. तर नेपाळच्या खात्यात 1 पॉइंटच असेल. त्यामुळे टीम इंडिया सहज सुपर 4 साठी क्वालिफाय करेल.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.