AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : कॅप्टनकडे दाद मागायला गेला, पण बाबर आजमनेच त्याच्यावर नाही दाखवला विश्वास VIDEO

IND vs PAK : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान मॅचमधील घटना. तो बाबर आजमकडे मागणी करत होता. पण बाबर आजमने त्याच ऐकलं नाही. पावसामुळे स्थगित झालेला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना आज पुन्हा खेळला जाईल.

IND vs PAK : कॅप्टनकडे दाद मागायला गेला, पण बाबर आजमनेच त्याच्यावर नाही दाखवला विश्वास VIDEO
Asia cup 2023 ind vs pak Image Credit source: AFP
| Updated on: Sep 11, 2023 | 9:42 AM
Share

कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये बरोबर आठ दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला होता. त्यांनी दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला धक्का दिला होता. आशिया कप स्पर्धेत सुपर-4 राऊंडमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाकडून अशीच अपेक्षा होती. पण रविवारी 10 सप्टेंबरला पाकिस्तानी टीमच नाही, तर त्यांचे फॅन्सही हैराण झाले. टीम इंडियाने या मॅचमध्ये जोरदार सुरुवात केली तसच विकेटसाठी पाकिस्तानला चांगलच तरसवलं. या दरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने असं काही केलं की, कॅप्टन बाबर आजमनेच त्याची फिरकी घेतली. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी सुपर-4 राऊंडच्या सामन्यात टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली.

सामन्याच्या सुरुवातीलाच स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह विकेट मिळवून देतील अशी अपेक्षा होती. पण यावेळी असं झालं नाही. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने त्यांची धुलाई केली. दोघांनी आक्रमक बॅटिंग करताना अर्धशतक झळकवलं. शतकी भागीदारी केली. पाकिस्तानने अथक मेहनतीने अखेर दोघांचे विकेट मिळवले. पाकिस्तानने बऱ्याच प्रतिक्षेनंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे सलग दोन ओव्हरमध्ये विकेट काढले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल क्रीजवर होते. दोघांपैकी एकाला बाद करुन टीम इंडियाला दबावाखाली आणण्याची पाकिस्तानकडे संधी होती.

पाकिस्तानी कॅप्टनवर याचा काही परिणाम झाला नाही

वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने 24 व्या ओव्हरमध्ये केएल राहुल विरुद्ध LBW च जोरदार अपील केलं. अंपायरने आऊट दिलं नाही. त्यावेळी रौफ कॅप्टन बाबर आजमकडे वळला व राहुल आऊट असल्याच सांगत होता. कॅप्टनकडे त्याने DRS ची मागणी केली. हॅरिस रौफ रिव्यूसाठी आजमवर दबाव टाकत होता. पण पाकिस्तानी कॅप्टनवर याचा काही परिणाम झाला नाही. बाबर आजम उलट हसत होता. त्याला रौफची मागणी पटत नव्हती. बाबर इशारा करुन सांगत होता की, चेंडू पॅडला नाही, तर थाय पॅडला लागला आहे, जो स्टम्पसपेक्षा वर आहे. चेंडू स्टम्पसच्या वर गेलाय असं आजम सांगत होता. रिव्यू फुकट जाईल असं बाबरच म्हणणं होतं. बाबरने रौफला हेच सांगितलं. बाबर जे सांगता होता, ते बरोबर होतं. कारण चेंडू खरच स्टम्पसच्या वरुन जात होता.

19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य
... म्हणून कोणी दात तोडत नाही! मोहन भागवत याचं मोठं वक्तव्य.
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल
गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? राऊतांचा संघाला सवाल.
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य
सगळ्यांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव! मोहन भागवतांचं वक्तव्य.
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल
बांगलादेशला मदत कशासाठी? संजय राऊत यांचा सरकारला सवाल.
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान
मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मुळच्या काँग्रेसच्या! राऊतांचं मोठं विधान.
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा
आमच्या दबावापोटी भाजपनं मराठी महापौर दिला! राऊतांचा दावा.
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे; ठाकरेंची माघार
मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे; ठाकरेंची माघार.