AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : दुसऱ्या सामन्यानंतर टीममध्ये बदल, असा आहे सुधारित संघ, कोण IN कोण आऊट?

Australia vs India T20i Series 2025 : ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये टीम इंडियावर 4 विके्टसने मात करत टी 20i मालिकेतील पहिला सामना जिंकला. मात्र त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यासाठी काही बदल केले आहेत. जाणून घ्या.

AUS vs IND : दुसऱ्या सामन्यानंतर टीममध्ये बदल, असा आहे सुधारित संघ, कोण IN कोण आऊट?
india vs australia t20i series 2025Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 31, 2025 | 11:09 PM
Share

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील पहिला टी 20I सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या टी 20I सामन्यात विजयी सलामी दिली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना हा 4 विकेट्सने जिंकला. भारताने विजयासाठी दिलेलं 126 धावांचं आव्हान कांगारुंनी 13.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह टीम इंडियाची मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील विजयी घोडदौड रोखली. टीम इंडियाने या मैदानात 17 वर्षांनंतर टी 20I सामना गमावला.

तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल

दुसरा सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर तिसऱ्या टी 20I मध्ये विजय मिळवणं महत्त्वाचं झालं आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा रविवारी 2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये होणार आहे. त्याआधी यजमान ऑस्ट्रेलिया संघात बदल झाला आहे. हे बदल होणार असल्याचं या मालिकेआधीच ठरलं होतं.

जोश हेझलवूड 2 सामन्यांचा पाहुणा

जोश हेझलवूड याला पहिल्या 2 सामन्यांसाठीच संधी देण्यात आली होती. त्यामुळे जोश उर्वरित मालिकेचा भाग नसले. जोशने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स मिळवल्या. जोशनंतर आता उर्वरित 3 सामन्यांसाठी माहली बिअर्डमॅन ऑस्ट्रेलिया संघासह जोडला जाणार आहे. तसेच सीन एबॉट याला पहिल्या 3 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. तर बेन द्वारशुईस याला शेवटच्या 2 अर्थात चौथ्या आणि पाचव्या टी 20I साठी संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या टी 20I सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हीस हेड, सीन एबॉट, झेव्हीयर बार्टलेट, महली बियर्डमॅन, टीम डेव्हीड, नॅथन एलिस, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मॅथ्यू कुहनेमॅन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, जोश फिलिप (विकेटकीपर) एडम झॅम्पा आणि मिचेल ओवेन.

टीम इंडिया 2024 पासून अजिंक्य, ऑस्ट्रेलिया रोखण्यात यशस्वी ठरणार?

दरम्यान टीम इंडियाचा 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपासून दबदबा कायम आहे. भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर एकदाही टी 20i मालिका गमावलेली नाही. भारताने टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर एकूण 5 टी 20i मालिका खेळल्या आहेत. भारताने सर्व मालिका जिंकल्या आहेत. तसेच भारताने ऑस्ट्रेलियातही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे कॅप्टन सुर्यकुमार यादव याच्यासमोर ही विजयी घोडदौड कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.