AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा

INDvsWI 2nd ODI: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं.

INDvsWI 2nd ODI: अक्षर पटेलने SIX मारुन मॅच संपवली, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा
IND vs WI Image Credit source: PTI
| Updated on: Jul 25, 2022 | 10:25 AM
Share

मुंबई: भारताने काल सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत (IND vs WI) 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी 312 धावांच लक्ष्य दिलं होतं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 विकेट आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. अक्षर पटेल (Axar Patel) भारताच्या विजयाचा नायक आहे. त्याच्या तुफान फलंदाजीमुळे भारताला हा विजय मिळवता आला. तत्पूर्वी करीयर मधील 100 वा वनडे सामना खेळणारा वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने (Shai Hope) शानदार शतक झळकावलं. कॅप्टन निकोलस पूरनने 74 धावा बनवून त्याला चांगली साथ दिली. पण त्यांची ही खेळी वाया गेली. अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हर मध्ये षटकार ठोकून एमएस धोनीचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं

एकवेळ भारताची स्थिती 18 षटकानंतर 3 बाद 79 होती. त्यावेळी श्रेयस अय्यर (63) आणि संजू सॅमसनने (54) भारताचा डाव सावरला. दोघांनी आपआपली अर्धशतकं फटकावतानाच 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दीपक हुड्डा (33) आणि अक्षरने झटपट 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने तुफान फटकेबाजी केली. त्याने 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते. आवेश खानने देखील दोन चौकार लगावले. त्यामुळे अखेरच्या 3 चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. अक्षर पटेलने त्यानंतर कायली मेयर्सने टाकलेल्या चौथ्या लो फुल टॉस चेंडूवर लाँग ऑफला षटकार खेचला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विजयाच स्वप्न भंग पावलं. भारताने दुसऱ्यासामन्यासह मालिकाही खिशात घातली.

दोन्ही सामान्यात रोमांचक विजय

भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने रोमांचकारी पद्धतीनं जिंकले आहेत.वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चौकार मारता न आल्याने भारताने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मालिकेतील पहिला वनडे सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. त्याचवेळी भारताने 50 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारून दुसरा एकदिवसीय सामना जिंकला.अशा प्रकारे भारताने दोन्ही सामने रोमांचकारी पद्धतीने जिंकले.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?