AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 दरम्यान रंगणार 2 मालिकांचा थरार, 6 सामन्यांच्या वेळेत अचानक बदल, कारण काय?

Cricket Match Time : विजेची बचत करण्यासाठी क्रिकेट बोर्डाने मालिकांच्या सामन्यात वेळेत बदल केला आहे. त्यामुळे सुधारित वेळेनुसार आता डे-नाईटऐवजी सकाळी सामन्यांना सुरुवात होणार आहे.

IPL 2026 दरम्यान रंगणार 2 मालिकांचा थरार, 6 सामन्यांच्या वेळेत अचानक बदल, कारण काय?
IPL 2026 CricketImage Credit source: PTI
| Updated on: Apr 09, 2026 | 6:44 PM
Share

भारतात सध्या 10 संघांमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा (IPL 2026) थरार सुरु आहे. आयपीएल स्पर्धेत अपवाद वगळता अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतात. आयपीएल स्पर्धेदरम्यान क्वचितच द्विपक्षीय मालिकेचं आयोजन केलं जातं. बीसीबी अर्थात बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु असताना द्विपक्षीय मालिकेचं आयोजन केलं आहे. यजमान बांगलादेश न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20I मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. बीसीबीने मायदेशात होणाऱ्या या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक आधीच जाहीर केलं आहे. मात्र आता या मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीबीने सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे

न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा

न्यूझीलंड क्रिकेट टीम बांगलादेश दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 असे एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात वनडे सीरिजने 17 एप्रिलपासून होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका वुमन्स टीम बांगलादेश दौऱ्यावर असणार आहे.

वीज बचतीसाठी बीसीबीचा मोठा निर्णय

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातही एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुरुष आणि महिला संघांच्या या मालिकेतील सामन्यांच्या वेळेत बदल केला आहे. विजेची बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

ढाका आणि चट्टोग्राममध्ये एकदिवसीय मालिकेतील सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. नियोजित वेळापत्रकानुसार महिला संघांमध्ये होणारे हे सामने डे नाईट असे होणार होते. मात्र आता सामन्यांची वेळ बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता या सामन्यांना सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर सूर्यास्ताआधी सामना संपवण्याचा क्रिकेट बोर्डाचा प्रयत्न असणार आहे. अंदाजे सामन्याची स्थानिक वेळेनुसार साडे सहा वाजता सांगता होईल. दिवसा सामने आयोजित केल्याने विजेची बचत होईल, अशी आशा बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आहे.

तसेच मेन्स टीमच्या टी 20i सीरिजमधील सामन्यांना दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तसेच सामना संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांपर्यंत संपवण्याचा बीसीबीचा प्रयत्न असणार आहे. वुमन्स टीमच्या टी 20i सीरिजमध्ये एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वेळापत्रकानुसार हे 3 सामने 28-30 एप्रिल आणि 2 मे रोजी होणार आहेत. या सामन्यांना संध्याकाळी साडे सहाऐवजी दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील सामनेही दिवसा होणार आहेत.

दरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल. मात्र क्रिकेट चाहत्यांना भर उन्हात स्टेडियममध्ये बसून हे सामने पाहावे लागतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...