AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांग्लादेशचा पत्ता कट झाला आहे. क्रिकेट बोर्ड आणि सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बांग्लादेश क्रिकेटला फटका बसला आहे. भारतात खेळायचं नाही या एका भूमिकेमुळे सर्व काही संपुष्टात आलं. आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.

मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलं
मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलंImage Credit source: PTI
| Updated on: Jan 23, 2026 | 3:39 PM
Share

आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने भारतात खेळणार नसल्याची भूमिका घेतली. यासाठी आयसीसीने वारंवार अल्टिमेटम दिला. स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही निर्णय घेत नव्हतं. सरकार देखील त्याच भूमिकेवर ठाम होतं. अखेर 22 जानेवारीला सरकारने भारतात खेळणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. त्यानंत आयसीसीने बांगलादेशचा स्पर्धेतील पत्ता कट केला. बांग्लादेश सरकार, क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंची एक बैठक या निर्णयापूर्वी पार पडली होती. यावेळी खेळाडूंचं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्याची तसदी सरकार आणि क्रिकेट बोर्डाने घेतली. त्यांना थेट सांगितलं गेलं की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे खेळाडूंना मानसिक धक्का बसला. कारण अनेक खेळाडूंचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झालं.

रिपोर्टनुसार, कर्णधार लिट्टन दास आणि कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी आपलं म्हणणं सरकारपुढे मांडलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहोत. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांना नकार दिला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या एका खेळाडूने सांगितलं की सरकारने या बैठकीपूर्वीच शेवटचा निर्णय घेतला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. क्रिकेटपटूने सांगितलं की, ‘त्यांचं म्हणणं ऐकून देखील घेतलं नाही. त्यांनी सरळ एक प्लान तयार केला आणि सांगितलं की असं होऊ शकत नाही. यापूर्वी ते आमच्यासोबत बसायचे आणि चर्चा करून आमचं म्हणणं ऐकायचे. पण यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण जात नाहीत. बांगलादेश सरकारच्या आदेशापूर्वीच हे ठरलं होतं. सरकारकडून स्पष्ट संदेश होता की असं होणार नाही.’

बांगलादेशचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता त्यांना फक्त हे सामने घरी बसून पाहावे लागतील. त्यांची जागा आधीच स्कॉटलंड संघाने घेतली आहे. बांगलादेशचे सर्व सामने आता स्कॉटलंड संघ खेळणार आहे. साखळी फेरीतील पहिले तीन सामने कोलकात्यात आणि शेवटचा सामना मुंबईत होणार आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग