AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांग्लादेशचा पत्ता कट झाला आहे. क्रिकेट बोर्ड आणि सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बांग्लादेश क्रिकेटला फटका बसला आहे. भारतात खेळायचं नाही या एका भूमिकेमुळे सर्व काही संपुष्टात आलं. आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.

मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलं
मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलंImage Credit source: PTI
| Updated on: Jan 23, 2026 | 3:39 PM
Share

आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने भारतात खेळणार नसल्याची भूमिका घेतली. यासाठी आयसीसीने वारंवार अल्टिमेटम दिला. स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही निर्णय घेत नव्हतं. सरकार देखील त्याच भूमिकेवर ठाम होतं. अखेर 22 जानेवारीला सरकारने भारतात खेळणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. त्यानंत आयसीसीने बांगलादेशचा स्पर्धेतील पत्ता कट केला. बांग्लादेश सरकार, क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंची एक बैठक या निर्णयापूर्वी पार पडली होती. यावेळी खेळाडूंचं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्याची तसदी सरकार आणि क्रिकेट बोर्डाने घेतली. त्यांना थेट सांगितलं गेलं की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे खेळाडूंना मानसिक धक्का बसला. कारण अनेक खेळाडूंचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झालं.

रिपोर्टनुसार, कर्णधार लिट्टन दास आणि कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी आपलं म्हणणं सरकारपुढे मांडलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहोत. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांना नकार दिला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या एका खेळाडूने सांगितलं की सरकारने या बैठकीपूर्वीच शेवटचा निर्णय घेतला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. क्रिकेटपटूने सांगितलं की, ‘त्यांचं म्हणणं ऐकून देखील घेतलं नाही. त्यांनी सरळ एक प्लान तयार केला आणि सांगितलं की असं होऊ शकत नाही. यापूर्वी ते आमच्यासोबत बसायचे आणि चर्चा करून आमचं म्हणणं ऐकायचे. पण यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण जात नाहीत. बांगलादेश सरकारच्या आदेशापूर्वीच हे ठरलं होतं. सरकारकडून स्पष्ट संदेश होता की असं होणार नाही.’

बांगलादेशचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता त्यांना फक्त हे सामने घरी बसून पाहावे लागतील. त्यांची जागा आधीच स्कॉटलंड संघाने घेतली आहे. बांगलादेशचे सर्व सामने आता स्कॉटलंड संघ खेळणार आहे. साखळी फेरीतील पहिले तीन सामने कोलकात्यात आणि शेवटचा सामना मुंबईत होणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.