AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी, टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा-रहाणेला डच्चू, रोहित शर्मा कर्णधार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या आगामी T20I आणि कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघांची निवड केली आहे. टीम इंडिया लखनौ आणि धर्मशाला येथे अनुक्रमे तीन T20I आणि मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी, टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा-रहाणेला डच्चू, रोहित शर्मा कर्णधार
Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara
| Updated on: Feb 19, 2022 | 5:17 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या आगामी T20I आणि कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघांची निवड केली आहे. टीम इंडिया लखनौ आणि धर्मशाला येथे अनुक्रमे तीन T20I आणि मोहाली आणि बेंगळुरू येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघातून अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांना डच्चू दिला आहे. दोन्ही खेळाडू गेल्या एक ते दीड वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहेत. दोघेही खेळपट्टीवर सातत्याने धावांसाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने कसोटी संघातून या दोघांना वगळलं आहे.

रहाणे आणि पुजाराच्या जागी प्रियांक पांचाळ आणि श्रेयस अय्यरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जाईल. तर रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल किंवा शुभमन गिल सलामीला मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुजाराच्या जागेसाठी हनुमा विहारीदेखील प्रबळ दावेदार आहे. दरम्यान, रवींद्र जाडेजाने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

भारताचा टी-20 संघ : भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान

संघातून कोण बाहेर गेलं? चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, ऋद्धिमान साहा संघातून बाहेर

फिटनेसमुळे केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. शार्दुल टेस्ट आणि टी-20 दोन्ही संघांमध्ये नसणार आहे.

इतर बातम्या

23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.