AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने मॅच फिक्सिंग केली? आता बीसीसीआयने थेट सांगितलं की…

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची स्थिती खूपच नाजूक आहे. प्लेऑफमधील आशा जिवंत आहेत. मात्र ते गणित सोडवणं खूपच कठीण असल्याचं सध्याच्या फॉर्ममुळे दिसत आहे. असं असताना राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीवर फिक्सिंगचा आरोप लावला आहे. त्यावर आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने मॅच फिक्सिंग केली? आता बीसीसीआयने थेट सांगितलं की...
राजस्थान रॉयल्सImage Credit source: PTI
| Updated on: Apr 23, 2025 | 4:23 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेचा मध्यान्ह पार पडला असून हळूहळू प्लेऑफचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. अजूनही सर्वच संघांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. मात्र काही संघांसाठी हे गणित खूपच किचकट आहे. त्यापैकी एक संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स.. राजस्थान रॉयल्स संघाची या स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. पण दोन सामन्यांचा निकाल हा धक्कादायक लागला आहे. हातात असलेले दोन सामने गमवण्याची वेळ आली. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सहज विजय होईल असं वाटत होतं. पण या दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघावर फिक्सिंगचे आरोप लावले गेले आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एड हॉक कमिटीचे कन्वेनर जयदीप बिहानी यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बिहानी यांनी आरोप केला होता की, लखनौ विरुद्ध 2 धावांनी सामना गमावला तो सामना फिक्स होता.

जयदीप बिहानी यांच्या आरोपानंतर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केलेले आरोप निराधार असल्याचं सांगितलं आहे. तसेच मॅच फिक्सिंग वगैरे असं काहीच झालेलं नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ‘आरसीएमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत आणि सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी खोटी विधानं केली जात आहे.’ मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने बीसीसीआयकडे तक्रार केली होती. यानंतर बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती. सनरायझर्स हैदराबादने पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सला पराभूत करत आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र त्यानंतर सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. आरसीबीने 9 विकेट्सने , दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये आणि लखनौ सुपर जायंट्सने दोन धावांनी पराभूत केलं.

Follow Us
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.