AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंचं स्थान पक्कं, 5 जागांसाठी 16 क्रिकेटपटूंमध्ये मुकाबला, कुणाला लॉटरी लागणार?

टी 20 वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयची त्यासाठी आज महत्वाची बैठक आहे. ह्या बैठकीत कप्तान विराट कोहली आणि कोच रवी शास्त्रीही सहभागी होतील. टी 20 वर्ल्ड कपसाठी एकूण 15 सदस्यांची टीम आज निवडली जाईल.

T20 World Cup: वर्ल्ड कपसाठी 10 खेळाडूंचं स्थान पक्कं, 5 जागांसाठी 16 क्रिकेटपटूंमध्ये मुकाबला, कुणाला लॉटरी लागणार?
रवी शास्त्री आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 3:04 PM
Share

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपसाठी आज टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयची त्यासाठी आज महत्वाची बैठक आहे. ह्या बैठकीत कप्तान विराट कोहली आणि कोच रवी शास्त्रीही सहभागी होतील. अर्थातच ते ऑनलाईन असतील. शास्त्रींना तसही सध्या कोरोनानं गाठलेलं आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी एकूण 15 सदस्यांची टीम आज निवडली जाईल. त्यातल्या 10 खेळाडूंचं टीममधलं स्थान पक्कं मानलं जातंय. इतर 5 जागांसाठी 16 क्रिकेटर्सची दावेदारी आहे.

टी 20 वर्ल्ड कप हा (T20 World Cup 2021) हा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियानं 2007 नंतर एकही टी 20 चा वर्ल्ड कप जिंकलेला नाही. विराट कोहलीच्या संघाला तो जिंकण्याची संधी आहे.

कुणाचं स्थान पक्कं?

टी 20 वर्ल्ड कपसाठी जी टीम निवडली जाईल त्यात 10 क्रिकेटपटूंचं स्थान पक्कं असल्याचं क्रिकइंफोच्या बातमीत म्हटलंय. हे खेळाडू आहेत-विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार आणि युजवेंद्र चहल. त्यामुळे इतर 5 खेळाडू कोण असतील याबद्दल मोठी उत्सुकता आहे. पाच जागा आणि दावेदार 16 त्यामुळे स्पर्धा तगडी आहे. तसंच टीमसोबत तीन रिजर्व खेळाडूही यूएईला जाणार.

टीममध्ये अतिरीक्त बॅटसमन असेल?

टीममध्ये हार्दीक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांच्याशिवाय 5 स्पेशलिस्ट बॅटसमन आहेत. त्यामुळेच टीममध्ये आणखी एखाद्या बॅटसमनला जागा मिळणार का याचीही उत्सुकता आहे. तसं झालं तर मग शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांच्यात मुकाबला आहे. फक्त बॅटसमनच नाही तर आणखी दोन फास्ट बॉलर्सनाही टीममध्ये संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शार्दूल ठाकूर, दीपक चहर, टी नटराजन, मोहम्मद सिराज आणि शमीमध्ये रेस आहे.

तिसरा ऑलराऊंडर कोण?

टीमध्ये स्पिन ऑलराऊंडर कोण असेल? त्यासाठी तीन नावं रेसमध्ये आहेत. अक्षर पटेल, क्रुणाल पंड्या आणि वाशिंग्टन सुंदर. सध्या तरी सुंदर जखमी आहे. पण त्याला रिजर्व खेळाडू म्हणून घेतलं जाऊ शकतं. आणखी एक स्पेशलिस्ट स्पिन बॉलरची टीमला गरज लागेल. त्यात आर. अश्विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा आहे. पण अश्विन बऱ्याच काळापासून टी 20 खेळलेला नाहीय. त्यामुळे त्याला संधी मिळेल का याबाबत साशंकताच आहे. वरुण चक्रवर्तीचा फिटनेसचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच राहुल चहरला संधीची दाट शक्यता आहे.

(BCCI Selection Committee india Squad for Cricket T20 World Cup 2021 )

हे ही वाचा :

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या शार्दूलचा क्रिकेट प्रवास, ऑस्ट्रेलियापासून ते इंग्लंडपर्यंत हवा, असा घडला ‘Lord शार्दूल ठाकूर’

Birthday Special : तरुण-तडफदार युवा फलंदाज, भारतीय क्रिकेटचं भविष्य, विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.