AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ आनंदी, प्रत्येकानं सांगितल्या मनातील भावना, पाहा VIDEO

भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात 2014 नंतर प्रथमच विजय मिळवत पुन्हा एकदा सोनेरी आठवणींना उजाळा दिला. या आनंदाच्या क्षणी भारतीय खेळाडूंनी आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ आनंदी, प्रत्येकानं सांगितल्या मनातील भावना, पाहा VIDEO
भारतीय संघ
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 4:00 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात लॉर्ड्च्या ऐतिहासिक मैदानात पार पडलेल्या सामन्यात भारताने  इंग्लंडवर 151 धावांनी मात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंड संघासोबत पूर्वीपासूनचं सामने अत्यंत चूरशीचे होत असतात. त्यामुळे हा विजय कोट्यवधी भारतीयासांठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात लॉर्ड्स मैदानात सामना जिंकल्याचा आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान या विजयानंतर प्रत्येक खेळाडूच्या भावना एका छोट्या व्हिडीओच्या स्वरुपात बीसीसीआयने (BCCI) शेअर केल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये सर्वात आधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हणतो, ”आम्ही याआधीही अनेक परदेशात जाऊन सामने जिंकले आहेत. पण आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. याचं संपूर्ण श्रेय सर्व संघाला जातं.” विराटनंतर उपकर्णधार अजिंक्यने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”संपूर्ण संघाने अप्रतिम कामगिरी केली. पण दुसऱ्या डावातील खेळ विजयात महत्त्वाचा ठरला. हा विजय आमच्यासाठी खूप खास आहे.”

सलामीवीर रोहित-राहुल म्हणाले…

सामन्यात सुरुवातीला एक भक्कम अशी शतकी भागिदारी करुन देणारे भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही आपल्या भावना शेअर केल्या. रोहित म्हणाला, ”हा विजय एक किंवा दोन जणांनी नाही, तर संपूर्ण 11 जणांनी मिळून मिळवून दिला आहे. प्रत्येकानी गरजेच्या वेळी आपला खेळ दाखवत सामना विजयाच्या दिशेने नेला.” तर राहुल म्हणाला,”इंग्लंडसारख्या देशात विजय मिळवणं एक मोठी आणि खास गोष्ट आहे. मागील 2.5 महिन्यांहून अधिक काळ आम्ही सराव केल्याचं हे फळ आहे.”

ही कामगिरी कायम ठेवण्याकडे लक्ष – पुजारा

सामन्यात काही खास कामगिरी केली नसली तरी गरजेच्या क्षणी रहाणेसोबत ठामपणे उभा राहिलेल्या चेतेश्वर पुजाराने देखील आनंद व्यक्त केला. पण आणखी तीन सामने शिल्लक असून अशीच कामगिरी कायम ठेवणे गरजेचे असल्याचे पुजारा म्हणाला. व्हिडीओत अखेर गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी हिंदीत प्रतिक्रिया देत आपलं मत मांडले. शमीने या विजयानंतरचा आत्मविश्वास पुढील सामन्यात ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर सिराजने देशासाठी अशाप्रकारे सामना जिंकवून देणं माझ्यासाठी खूप अभिमानास्पद असल्याचं सांगितलं.

इतर बातम्या

IND vs ENG : असं काय घडलं? ज्यानंतर भारताने सामना अनिर्णीत न सोडता जिंकायचाच ठरवलं, विराटने दिलं उत्तर

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

(BCCI Shares Video of indian players reaction after winning lords test against England)

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस