चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि…Video

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजीतून हव्या तशा धावा येत नाहीत. त्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. विराट कोहली आपल्या फॉर्मसाठी झटत आहे. असं असताना त्याने प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्याला काही प्रश्नांची उत्तर तिथे मिळाली.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि...Video
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 4:26 PM

विराट कोहलीसाठी मागचं वर्ष काही खास राहिलं नाही. एखाद दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट चालली असेल पण फार काही ग्रेट केलं नाही. पण अनुभवी फलंदाज असल्याने त्याची संघात जागा आहे. मागच्या खेळी आणि त्याच्या अनुभवाची शिदोरी पाहता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी स्थान मिळणार यात काही शंका नाही. पण विराट कोहली त्याच दमाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धावा करणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने शतक केलं. पण त्यानंतर त्याची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. इतकंच काय तर अनेकांनी सोशल मीडियावरून त्याने निवृत्त व्हावं अशी टीकाही केली. असं सर्व वातावरण असताना विराट कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला गेला. तिथे प्रेमानंद महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. तसेच काही प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली आपल्या कुटुंबासह तिथे हात जोडून बसल्याचं दिसत आहे.

प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहलीला विचारलं की, बरा आहेस ना.. तेव्हा कोहलीने आपलं डोकं हलवत हा असं उत्तर दिलं. प्रेमानंदजी महाराजांनी नंतर सांगितलं की, ‘कोहली खेळाच्या माध्यमातून सेवा करत आहे आणि त्याला परमेश्वराकडून जे काही प्राप्त झालं आहे त्याच्या उच्चतम पातळीवर आहे. पण सरावात कोणतीच उणीव नसावी. पण प्रारब्ध असतात. काही अशुभ प्रारब्ध असले की अपयश मिळतं. पण सरावात कोणतीच कमतरता नसावी.’

‘सराव पूर्ण असेल आणि प्रारब्धही पूर्ण असेल तर विजय निश्चित मिळतो. पण चांगला सराव करूनही कधी कधी प्रारब्धही आडवं येतं. त्यामुळे दु:ख भोगावं लागतं. अन्य लोकांच्या प्रभावामुळे चांगली कामगिरी करूनही अपयश मिळतं. कारण हा खेळ एकट्याचा नाही. त्यामुळे देवाचं नामस्मरण करून धीर ठेवावा लागेल. कठीण आहे पण अपयशात धीराने हसत पुढे निघून जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आता अपयश राहणार नाही. जर दिवस राहात नाही तर रात्र तरी कशी राहील.’, असं प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहली याला सांगितलं.

'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.