AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि…Video

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजीतून हव्या तशा धावा येत नाहीत. त्यामुळे टीकेचा धनी ठरला आहे. विराट कोहली आपल्या फॉर्मसाठी झटत आहे. असं असताना त्याने प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्याला काही प्रश्नांची उत्तर तिथे मिळाली.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या चरणी, मिळालं अपयशाचं उत्तर आणि...Video
| Updated on: Jan 10, 2025 | 4:26 PM
Share

विराट कोहलीसाठी मागचं वर्ष काही खास राहिलं नाही. एखाद दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट चालली असेल पण फार काही ग्रेट केलं नाही. पण अनुभवी फलंदाज असल्याने त्याची संघात जागा आहे. मागच्या खेळी आणि त्याच्या अनुभवाची शिदोरी पाहता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी स्थान मिळणार यात काही शंका नाही. पण विराट कोहली त्याच दमाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धावा करणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने शतक केलं. पण त्यानंतर त्याची गाडी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. इतकंच काय तर अनेकांनी सोशल मीडियावरून त्याने निवृत्त व्हावं अशी टीकाही केली. असं सर्व वातावरण असताना विराट कोहली प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला गेला. तिथे प्रेमानंद महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला. तसेच काही प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली आपल्या कुटुंबासह तिथे हात जोडून बसल्याचं दिसत आहे.

प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहलीला विचारलं की, बरा आहेस ना.. तेव्हा कोहलीने आपलं डोकं हलवत हा असं उत्तर दिलं. प्रेमानंदजी महाराजांनी नंतर सांगितलं की, ‘कोहली खेळाच्या माध्यमातून सेवा करत आहे आणि त्याला परमेश्वराकडून जे काही प्राप्त झालं आहे त्याच्या उच्चतम पातळीवर आहे. पण सरावात कोणतीच उणीव नसावी. पण प्रारब्ध असतात. काही अशुभ प्रारब्ध असले की अपयश मिळतं. पण सरावात कोणतीच कमतरता नसावी.’

‘सराव पूर्ण असेल आणि प्रारब्धही पूर्ण असेल तर विजय निश्चित मिळतो. पण चांगला सराव करूनही कधी कधी प्रारब्धही आडवं येतं. त्यामुळे दु:ख भोगावं लागतं. अन्य लोकांच्या प्रभावामुळे चांगली कामगिरी करूनही अपयश मिळतं. कारण हा खेळ एकट्याचा नाही. त्यामुळे देवाचं नामस्मरण करून धीर ठेवावा लागेल. कठीण आहे पण अपयशात धीराने हसत पुढे निघून जाणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आता अपयश राहणार नाही. जर दिवस राहात नाही तर रात्र तरी कशी राहील.’, असं प्रेमानंदजी महाराज यांनी विराट कोहली याला सांगितलं.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.