AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण

आयपीएल 2026 स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं वजन दिसलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघ फक्त 127 धावा करू शकला. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने फक्त 12.1 षटकात पूर्ण केलं.

RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण
राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारणImage Credit source: CSK TWITTER
| Updated on: Mar 30, 2026 | 11:08 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने दारूण पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. खरं तर या सामन्यात 200 पार धावांची गरज होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. दहाव्या विकेटसाठी ओव्हरटन आणि अंशुल कंबोजने 33 धावांची भागीदारी केली म्हणून 127 धावा करू शकले. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 12.1 षटकात 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. राजस्थान रॉयल्सला 2 गुण मिळाले. इतकंच काय तर +4.171 नेट रनरेट झाला आहे. या पराभवाचं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विश्लेषण केलं.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘सुरुवातीला खेळपट्टी खूपच कठीण होती. फिरकी गोलंदाजांनाही थोडी मदत मिळत होती. तुम्हाला फक्त खेळत राहायचं असतं. खेळपट्टी थोडी कठीण होती. तुम्ही ते विसरून पुढे जायचं, तीन दिवसांनी आमचा दुसरा सामना आहे. संघात बरेच तरुण खेळाडू आहेत. मी अंतिम विजयावर ठाम विश्वास ठेवणारा नाही. महत्त्वाच्या खेळाडूच्या बाबतीत, सरासरी धावसंख्या किती असावी हे निश्चित नसतं. फलंदाजांसाठी फक्त आपल्या खेळावर विश्वास ठेवण्यावर भर होता. आज ते जमलं नाही. आम्ही फलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकतो.’

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, नाणेफेकीत मी नशीबवान ठरलो. आम्हाला माहित होतं की दमटपणाचा परिणाम होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या योजनांची अंमलबजावणी केली. यासाठी खूप तयारी झाली आहे. यावर्षी ट्रॉफी जिंकणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला एक असा संघ बनायचे आहे जो स्मार्ट क्रिकेट खेळेल. ब्रिजेशने जे केले ते अविश्वसनीय होते. मी वैभवला सांगतो की तो 14 सामने खेळणार आहे. आणि तो जाऊन असे काहीतरी करतो. तो माझ्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय