AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 स्पर्धेचा जेतेपद चेन्नई सुपर किंग्सला मिळणार! सीएसकेच्या सीईओने सांगितलं असं गणित

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्सला जागा मिळणं कठीण झालं आहे. गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ तळाला आहे. अशा स्थितीत टॉप 4 मध्ये जागा मिळवून जेतेपद मिळवणं कठीण आहे. पण चेन्नई सुपर किंग्सच्या सीईओने एक दावा केल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे.

IPL 2025 स्पर्धेचा जेतेपद चेन्नई सुपर किंग्सला मिळणार! सीएसकेच्या सीईओने सांगितलं असं गणित
महेंद्रसिंह धोनीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 22, 2025 | 9:12 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. अजूनही या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्स आऊट झालेला नाही. सहा सामने शिल्लक असून दोन पराभवानंतर गाशा गुंडाळावा लागणार आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स आहे. दुसरीकडे, चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभवाची धूळ चारली. त्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे फलंदाजीतही चेन्नई सुपर किंग्स कमकुवत झाली आहे. असं सर्व नकारात्मक वातावरण असताना चेन्नई सुपर किंग्सचे सीईो काशी विश्वनाथ यांनी एक धावा केला आहे. यंदाचं जेतेपद चेन्नई सुपर किंग्स मिळवणार असल्याचा दावा केला आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स 2010 सारखा चमत्कार करेल असं त्यांनी सांगितलं आहे.

आयपीएल 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने पहिल्या सात सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला होता. त्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर सलग दोन सामने जिंकले होते. पण चेन्ई सुपर किंग्सने धोनीच्या नेतृत्वात सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण उर्वरित सात पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला. सीएसकेने तिसरं स्थान गाठतं प्लेऑफमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर चेन्नईने अंतिम फेरीत जागा मिळवली. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी सामना झाला आणि सीएसकेने मुंबई इंडियन्सला 22 धावांनी पराभूत करून जेतेपदावर नाव कोरलं होतं.

2025 आयपीएल स्पर्धेतही चेन्नई सुपर किंग्सची काहीशी अशीच स्थिती आहे. आतापर्यत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे पदरात फक्त 4 गुण आहे. त्यामुळे उर्वरित सहा सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. कारण सहा सामन्यात विजय मिळवला तरच पात्र होण्यासाठी 16 गुण होतील. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. चेन्नईला दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

Follow Us
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?