AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : लॉर्ड्समध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? 19 पैकी किती सामने जिंकले?

England vs India 3rd Test Lords : लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानाला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं. त्यामुळे या मैदानात सांघिक आणि वैयक्तिक पातळीवर चमकदार कामगिरी करुन आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न टीम आणि खेळाडूचा असतो. भारताने या मैदानात किती कसोटी सामने खेळले आहेत? जाणून घ्या.

ENG vs IND : लॉर्ड्समध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? 19 पैकी किती सामने जिंकले?
Lords GroundImage Credit source: @HomeOfCricket
| Updated on: Jul 10, 2025 | 12:22 AM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा 10 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन टॉसवेळेस स्पष्ट होईल. टीम इंडियाने लॉर्ड्समध्ये किती कसोटी सामने जिंकलेत? किती जिंकलेत? हे जाणून घेऊयात.

भारताची लॉर्ड्समधील कामगिरी

टीम इंडियाने या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 19 सामने खेळले आहेत. मात्र भारताची या मैदानात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. भारताने या मैदानात जितके सामने जिंकले नाहीत तितके ड्रॉ केले आहेत.

एकूण किती सामने जिंकले?

टीम इंडियाला लॉर्ड्समध्ये खेळलेल्या 19 पैकी 12 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. भारताला 4 सामने अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. तर फक्त 3 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारताने या 3 पैकी 2 सामने हे गेल्या 3 दौऱ्यांमध्ये जिंकले आहेत.

मालिका बरोबरीत

उभयसंघातील मालिका 2 सामन्यांनंतर बरोबरीत आहे. इंग्लंडने भारतावर पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. इंग्लंडने 371 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना हा 336 धावांनी जिंकला होता. आता दोन्ही संघांपैकी तिसरा सामना जिंकून कोणता संघ मालिकेत आघाडी घेतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराहचं कमबॅक

इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड टीममध्ये जोश टंग याच्या जागी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार असल्याचं कर्णधार शुबमन गिल याने दुसऱ्या कसोटीनंतर सांगितलं होतं. त्यामुळे बुमराहसाठी कुणाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.