T20 World Cup 2021 साठी आयसीसीने जाहीर केला भारतीय संघ, नव्या रुपात उतरणार टीम इंडिया!

आयपीएलचा थरार 15 ऑक्टोबरला संपताच 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आगामी टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. आयसीसीने सहभागी देशांच्या संघाची घोषणाही केली आहे.

T20 World Cup 2021 साठी आयसीसीने जाहीर केला भारतीय संघ, नव्या रुपात उतरणार टीम इंडिया!
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 8:53 PM

मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिल्याने आयसीसीने (ICC) देखील सहभागी होणाऱ्या सर्व 16 संघाच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या (Team India) 15 सदस्यीय संघाचाही समावेश आहे. दरम्यान आयसीसीने ही यादी जाहीर केली असली तरी भारत हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकतो.

दरम्यान आयसीसीने सर्व संघाची जर्सी त्यांच्या फॅन्ससाठी विकत घेण्याची सुविधाही त्यांच्या संकेतस्थळावर करुन दिली आहे. विशेष म्हणजे या आगामी  टी20 विश्व चषकासाठी टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी ही जर्सी लॉन्च केली जाणार आहे. आता संघाना बदल करण्यासाठी केवळ 4 दिवस उरल्याने भारतीय संघ काही बदल करणार का? हे पाहावे लागेल.

हार्दीक पंड्याला डच्चू?

आयसीसीकडे विश्वचषकासाठी संघ पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील काही खेळाडू अलीकडेच IPL-2021 मध्ये खेळून मोकळे झाले आहेत, तर काही अजूनही खेळत आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नावाची मोठी चर्चा आहे कारण त्याने गोलंदाजी न करणे हा चिंतेचा विषय आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, निवडकर्ते पंड्याबाबाबत अद्याप विचारात आहेत आणि तो गोलंदाज म्हणून संघात राहील की नाही याचा विचार करत आहेत. तसेच संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज जोडण्याचा विचार केला जात आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(For Upcoming T 20 world cup 2021 ICC Released the list of players of all 16 teams)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.