AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघ आयसीसीच्या रडारवर आला आहे. पण वर्ल्डकप स्पर्धेत बहिष्कार टाकण्याची ही काय पहिली वेळ नाही. यापूर्वी चार संघांनी असं केलं आहे.

वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या
वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्काराचा इतिहास जुनाच, या संघांनीही उचललं होतं पाऊल; कसं काय ते समजून घ्या Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 02, 2026 | 7:15 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची नाटकं सुरू झाली आहे. आता त्याने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्याचा नवा अंक सुरू केला आहे. या निर्णयावरून कधीही माघार घेऊ शकतात. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण त्याआधीच बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. आता पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहते की नाही हे आताच सांगणं कठीण आहे. त्यामुळे आयीसी पाकिस्तानवर कारवाई करण्याची शक्यता आहे. असं करणं खरंच आयसीसीला शक्य आहे का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पण पाकिस्तान वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यावर बहिष्कार टाकणारा पहिला संघ नाही. यापूर्वी चार संघांनी अशी कृती केली आहे. त्यांना आयसीसीने काय शिक्षा दिली ते समजून घेऊयात.

आयसीसी स्पर्धांचा इतिहास 50 वर्षे जुना आहे. 1975 मध्ये पहिला पुरूष वर्ल्डकप स्पर्धा पार पडली होती. तेव्हापासून आतापर्यंत बहिष्काराचे काही प्रकरणं घडली आहेत. यापूर्वी दोन वेगवेगळ्या वर्ल्डकप स्पर्धेतील 4 सामन्यात बहिष्कार टाकला गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला हे काय नवीन नाही.

सर्वात पहिल्यांदा 1996 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असा प्रकार घडला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेतील सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी एलटीटीईचा श्रीलंकेत प्रभाव होता. तेसच वर्ल्डकपच्या एक महिन्याआधी या दहशतवादी संघटनेने बँकेत स्फोट घडवला होता. यात 91 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने सुरक्षेचं कारण देत बहिष्कार टाकला होता. आयसीसीने या संघांवर कारवाई केली नाही. उलट दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुण गमवावे लागले होते. त्यामुळे श्रीलंकेला फायदा झाला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेने जेतेपदावर नाव कोरलं होतं.

2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत असंच घडलं. तेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी आपल्या सामन्यांवर बहिष्कार टाकला होता. इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना राजकीय कारणामुळे खेळला नव्हता. सुरक्षेचं कारण देत सामना खेळण्यास नकार दिला. तर न्यूझीलंडनेही सुरक्षेचं कारण पुढे करत केनियाविरुद्ध सामना खेळला नाही. त्यामुळे झिम्बाब्वे आणि केनियाला यांना प्रत्येकी 2 गुण मिळाले होते.

मागच्या इतिहास पाहता पाकिस्तानवर काही कारवाई होणार नाही. पण पाकिस्तानने सामने श्रीलंकेत आयोजित व्हावेत यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयसोबत करार केला होता. आता करार मोडत असल्याने पाकिस्तान संघ अडचणीत येऊ शकतो.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक