AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 क्रिकेटमध्ये भारताची आयर्लंडविरुद्ध कशी आहे कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. साखळी फेरीत पाच पाच संघांची चार गटात विभागणी झाली आहे. भारताच्या गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. भारताचा पहिलाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. चला जाणून घेऊयात या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी

टी20 क्रिकेटमध्ये भारताची आयर्लंडविरुद्ध कशी आहे कामगिरी, जाणून घ्या एका क्लिकवर
| Updated on: Jun 03, 2024 | 5:39 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत अ गटात असून पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहे. या गटातून भारत आणि पाकिस्तान आरामात सुपर 8 फेरीत जाणार असं अनेकांचं म्हणणं आहे. पण आयर्लंडचा मागचा इतिहास पाहिला तर पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहाणार नाही. 2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आधीच आयर्लंडने पाकिस्तानला लोळवून दाखवलं आहे. पाकिस्तानला 132 धावांवर रोखलं होतं तसेच ही धावसंख्या 3 गडी राखून गाठली होती. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान आयर्लंड मालिकेतही याची चुणूक दिसून आली आहे. पहिल्याच टी20 सामन्यात पाकिस्तानला धोबीपछाड दिला होता. दुसरीकडे, भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात आयर्लंडला गेला होता. तेव्हाही पहिल्या सामन्यात पाऊस पडला आणि डीएलएस नियमाने फक्त 2 धावांनी जिंकलो होतो. दुसरा सामना भारताने 33 धावांनी जिंकला आणि तिसरा सामना पावसामुळे झाला नाही. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकली. भारताच्या तुलनेत आयर्लंडचा संघ दुबळा असला तरी हलक्यात घेऊन चालणार नाही. अन्यथा स्पर्धेच्या साखळी फेरीतच भारताची नाचक्की होण्यास वेळ लागणार नाही.

भारत आणि आयर्लंड यांच्यात 5 जूनला सामना होणार आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारत आयर्लंड यांच्या एकूण 7 सामने झाले आहे. हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. 2009 ते 2023 दरम्याने हे सर्व सामने खेळले गेले आहेत. आता 2024 मध्ये पहिल्यांदाच हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. 15 वर्षानंतर भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी 2009 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदा आमनेसामने आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने तेव्हा 8 गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा रोहित शर्माने नाबाद 52 धावा केल्या होत्या. आता रोहित शर्मा कर्णधार आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्रयू बालबर्नी, कर्टिस कँपर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्राहम ह्यूम, जोश लिटिल, बैरी मैक्कार्थी, नील रॉक, हैरी टेक्टर, लोर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.