AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियम

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी आणि सुपर 8 फेरीचा थरार संपलेला आहे. आता उपांत्य फेरीची उत्सुकता आहे. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय? असे प्रश्न पडले आहेत. तर जाणून घेऊयात यासाठी आयसीसीचे नियम काय आहेत ते..

T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियम
T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियमImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 02, 2026 | 4:30 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती ठरल्या आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 4 मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. 4 मार्चचा सामना काही कारणास्तव झाला नाही तर 5 मार्चला होईल. तसंच 5 मार्चच्या सामन्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस आहे. राखीव दिवशी हा सामना झाला नाही तर काय? मग या सामन्याचा निकाल कसा लावणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सेमीफायनल सामन्याचा निकाल देण्यासाठी कमीत कमी किती सामने खेळणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

उपांत्य फेरीच्या निकालासाठी किती षटकं टाकणं आवश्यक?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर तसं पाहिलं तर पावसाचं काही सावट नाही. पण निसर्गाच्या लहरीपणाचं काही सांगता येत नाही. श्रीलंकेत पार पडलेल्या काही सामन्यांमध्ये पाऊस पडल्याने सामने रद्द करण्याची वेळ आली. पण उपांत्य फेरीत असं करून चालणार नाही. कारण अंतिम फेरीत कोण जाणार? हे ठरवावं लागणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार, उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल जाहीर करण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 10 षटकं खेळणं आवश्यक आहे.

दहा षटकांचा खेळ झाला नाही तर…

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर राखीव दिवशी खेळवला जाईल. पण राखीव दिवशीही 10-10 षटकांचा खेळ झाला नाही तर सामना रद्द केला जाईल. यावेळी निकाल हा सुपर 8 फेरीत टॉपला असलेल्या संघाच्या बाजूने लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना रद्द झाला तर इंग्लंडला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण सुपर 8 फेरीत गट 2 मध्ये इंग्लंडचा संघ टॉपला आहे. तर भारतीय संघ गट 1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Follow Us
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार