AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup :…जर असं झालं तर अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, जाणून घ्या संपूर्ण गणित

टी20 वर्ल्डकप जेतेपदासाठी अवघ्या तीन सामन्यांचा अवकाश आहे. तीन सामन्यानंतर नवव्या पर्वाचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरीच्या लढती 27 जूनला भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. पण या स्पर्धेत इंग्लंड आणि अफगाणिस्तानची धाकधूक वाढली आहे. कारण सामना न खेळताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

T20 World Cup :...जर असं झालं तर अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका, जाणून घ्या संपूर्ण गणित
| Updated on: Jun 26, 2024 | 2:45 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा आता शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. उपांत्य फेरी आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना असणार आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना होणार आहे. पण या दोन्ही सामन्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला सकाळी 6 वाजता दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचा व्यत्यय आल्यास एक दिवस राखीव आहे. पण भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी राखीव दिवस नाही. 27 जूनला रात्री 8 वाजता दोन्ही संघ आमनेसामने येतील. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर काही तास राखून ठेवले आहेत. या सामन्यासाठी सामन्याच्या तीन तासांव्यतिरिक्त 4 तास 10 मिनिटं राखीव आहेत.

दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर दुसरा दिवस आहे. पण त्या दिवशीही सामना होऊ शकला नाही तर दक्षिण अफ्रिकेला पुढचं तिकीट मिळेल. कारण गट दोन मधून दक्षिण अफ्रिका संघ तीन पैकी तीन सामने जिंकून अव्वल स्थानी आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पुढचं तिकीट मिळेल. तर अफगाणिस्तानला सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात असंच समीकरण आहे. एकतर या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. चार तासात पाऊस गेलाच नाही तर सामना रद्द करण्याशिवाय गत्यंतर नाही. गयाना येथील सामन्यात पाऊस पडेल अशी 88 टक्के शक्यता आहे. तर मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी 18 टक्के शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार यात शंका नाही. सामना रद्द करण्याची वेळ आली तर भारताला संधी मिळेल. कारण गट एक मधून तीन पैकी तीन सामने जिंकू भारत टॉपला आहे. अंतिम फेरीचा सामना 29 जूनला असून या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. आता अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळतं? याची उत्सुकता लागून आहे.

Follow Us
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट
ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
Rajabhau Waje | ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट... दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
Sushma Andhare On BJP | मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला...; 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांदरम्यान सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा!
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार