AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाज

एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाला सामोर जावं लागलं आहे. या स्पर्धेत भारताने 2013 पहिल्यांदा जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यंदाही तसंच झालं. जेतेपदाचं स्वप्न तगडी स्टारकास्ट असूनही भंगलं.

IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाज
IND-A vs BAN-A: उपांत्य फेरीचा सामना पाच खेळाडूंमुळे गमावला, सुपर ओव्हरमध्ये दोघांनी घालवली लाजImage Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Nov 21, 2025 | 8:29 PM
Share

रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 स्पर्धेत इंडिया ए संघाचं पारडं जड होतं. टीम इंडियात तगडे स्टार खेळाडू असल्याने जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटलं. पण साखळी फेरीत पाकिस्तानकडून आणि उपांत्य फेरीत बांगलादेशकडून पराभूत होऊन मायदेशी परतावं लागणार आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली पण अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद मिळण्याचं स्वप्न मात्र भंगलं. खरं तर उपांत्य फेरीत सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. तसेच विजयासाठी दिलेल्या 195 धावा सहज गाठेल अशी सुरुवातही झाली. पण 20 भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावांची बरोबरी गाठू शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये आयपीएलमध्ये स्टार फलंदाज फेल गेले. दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या आणि हाती फक्त भोपळा आला. त्यामुळे पराभव होणार हे निश्चित झालं. त्यातही वाइड टाकला आणि सामना संपला. या पराभवासाठी पाच खेळाडू जबाबदार आहेत. कसं ते समजून घ्या

जितेश शर्मा : उपांत्य फेरीतील पराभवासाठी कर्णधार स्वत: जबाबदार आहे. त्याने महत्त्वाच्या सामन्यात 23 चेंडूत 33 धावा केल्या. पण अशावेळी बाद होऊन परतला जेव्हा त्याची मैदानात गरज होती. सुपर ओव्हरमध्येही खराब खेळला आणि पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला.

नमन धीर : फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही ठिकाणी फ्लॉप ठरला. 12 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. तर गोलंदाजीत एकाच षटकात 28 धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी अतिरिक्त धावांचा बोजा पडला. झालंही तसंच एका धावेने पराभव निश्चित झाला.

विजयकुमार विशक : उपांत्य फेरीत बांगलादेशी फलंदाजांना तर विजयकुमार विशकची गोलंदाजी बोनस म्हणूनच मिळाली. विकेट तर दिली नाही. चार षटकात 51 धावा ठोकल्या. हा स्पेल भारताच्या पराभवाचं कारण ठरलं.

आशुतोष शर्मा : आयपीएलमध्ये आशुतोष शर्मा काही सामन्यात फिनिशरची भूमिका बजावताना दिसला आहे. पण उपांत्य फेरीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 6 चेंडूत फक्त 13 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये पहिली विकेट पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट टाकून आला.

रमणदीप सिंग : आयपीएल स्टार या खेळाडूनेही निराशा केली. उपांत्य फेरीत 11 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. इतकंच काय तर गोलंदाजीत 2 षटकं टाकली आणि 29 धावा दिल्या.

नेहल वढेरा: आयपीएलमध्ये नेहल वढेराचा भाव आहे. लिलावात हे दिसून आलं आहे. पण उपांत्य फेरीत संथ गतीने खेळणं टीम इंडियाला महागात पडलं. त्याने 29 चेंडूंचा सामना करत फक्त 32 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट फक्त 110 चा होता.

Follow Us
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.