AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत विचार करु नका, दिग्गजाने भारताबद्दल असं काय म्हटलं?

Border Gavaskar Trophy 2024 2025 : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियावर 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.

IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत विचार करु नका, दिग्गजाने भारताबद्दल असं काय म्हटलं?
टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. टीम इंडियाला सलग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या मालिकेत 4-1 ने विजय मिळवावा लागणार आहे.
| Updated on: Nov 06, 2024 | 12:27 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात पाहुण्या न्यूझीलंड टीमकडून कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही मालिका खेळणार आहे. यंदा या मालिकेत पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताने न्यूझीलंड विरुद्ध एकूण तिन्ही सामने गमावले. त्यामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 अशा फरकाने मालिका जिंकावी लागणार आहे. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या दिग्गजाने या मालिकेबाबत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप वर्ल्ड कप फायनलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करु शकत नाही, असं लिटिल मास्टर सुनील गावसकर यांना वाटतं. तसेच भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलऐवजी या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेकडे अधिक लक्ष केंद्रीत करायला हवं, असं गावसकर यांना वाटतं. गावसकर नक्की काय म्हणाले? हे आपण जाणून घेऊयात.

लिटिल मास्टर काय म्हणाले?

“टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करु शकत नाही. मात्र त्यांनी तसं केलं तर मला फार आनंद होईल. पण 4-0… वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत विचार करु नका. आता फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकण्याकडे लक्ष द्या. मालिका 1-0, 2-0, 3-0 किंवा 2-1 ने, फक्त विजय मिळवा. कारण तेव्हाच आम्ही एक भारतीय क्रिकेट चाहते म्हणून आनंद व्यक्त करु शकू”, असं गावसकर स्पोर्ट्स तकच्या एका कार्यक्रमात म्हणाले.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.