AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN 1st Test Result: टीम इंडियाचा बांग्लादेशवर मोठा विजय

IND vs BAN 1st Test Result: आज कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशचा डाव झटपट गुंडाळला

IND vs BAN 1st Test Result: टीम इंडियाचा बांग्लादेशवर मोठा विजय
ind vs ban 1st test
| Updated on: Dec 18, 2022 | 10:25 AM
Share

ढाका: टीम इंडियाने चटोग्राम कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या 6 बाद 272 वरुन आज बांग्लादेशने डाव पुढे सुरु केला. त्यांचे 4 विकेट बाकी होते. आज पाचव्या दिवशी स्कोर बोर्डवर फक्त 52 धावांची भर घालून बांग्लादेशचा डाव आटोपला. टीम इंडियाने बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं होतं. बांग्लादेशची टीम 324 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी मोठा विजय मिळवला.

कसोटीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड कायम

चटोग्राम कसोटी जिंकून टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध कसोटी फॉर्मेटमध्ये आपलं विजयी अभियान कायम ठेवलय. बांग्लादेशने अजूनपर्यंत कसोटीमध्ये भारतावर विजय मिळवलेला नाही. दोन्ही देशांमध्ये 12 कसोटी सामने खेळलेत. यात भारताने 10 सामने जिंकलेत. 2 कसोटी सामने ड्रॉ झालेत.

टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्थिती मजबूत

या विजयामुळे टीम इंडियाची WTC फायनलमध्ये खेळण्याची शक्यता वाढली आहे. टीम इंडियाला आता दुसरी कसोटी जिंकून 2-0 ने मालिका विजय मिळवावा लागेल. पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात केलीय. भारताचे चट्टोग्राम कसोटी जिंकून 12 पॉइंट्स झालेत. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंटस टेबलमध्ये स्थिती मजबूत झालीय.

भारताने असं हरवलं बांग्लादेशला

टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात काय झालं? त्यावर नजर टाकूया. भारताने पहिल्या डावात पुजारा आणि अक्षरच्या अर्धशतकाच्या बळावर 404 धावा केल्या. बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावात आटोपला. भारताकडून पहिल्या डावात कुलदीपने 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पुजारा आणि गिलच्या शतकाच्या बळावर भारताने दुसऱ्या इनिंगमध्ये 258 धावांवर डाव घोषित केला. बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं. बांग्लादेशची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 324 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने 188 धावांनी सामना जिंकला.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी