AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीवर आर अश्विनने सरळ व्यक्त केलं मत, असंच राहीलं तर…

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे मालिकेत आघाडीसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने विजय खूपच महत्त्वाचा आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. पण इंग्लंच्या बेझबॉल रणनितीने भारतीय गोलंदाजांची पिसं निघाली.

IND vs ENG : इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीवर आर अश्विनने सरळ व्यक्त केलं मत, असंच राहीलं तर...
IND vs ENG : इंग्लंडची आक्रमक रणनिती पाहून आर अश्विनने आधीच व्यक्त केलं भाकीत, म्हणाला...
| Updated on: Feb 16, 2024 | 7:04 PM
Share

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ संपला. भारताने दुसऱ्या दिवसापर्यंत सर्वाबद 445 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरला आणि बेझबॉल रणनिती सुरु ठेवली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना नेमका कुठे टप्पा टाकायचं याचाच विसर पडल्याचं दिसत होतं. अर्ध्या दिवसातच इंग्लंडने 2 गडी बाद 207 धावा केल्या. त्यामुळे भारताने समोर ठेवलेल्या धावांची बरोबरी साधण्यासाठी 238 धावांची गरज आहे. तसेच आक्रमक खेळी करणारा बेन डकेट मैदानात असून त्याला जो रूटची साथ आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना विकेट मिळाली नाही तर पुढचं गणित कठीण होईल असंच दिसत आहे. या सामन्यात जॅक क्राउलेला बाद करत आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दितील 500 विकेट पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याने आतापर्यंत कारकिर्दिवर भाष्य केलं. तसेच इंग्लंडची रणनिती पाहून एक भाकीतही वर्तवलं आहे.

आर अश्विनने व्यक्त केलं मत

“इंग्लंड ज्या प्रकारे खेळत आहे त्यावरून असं दिसतंय की जास्त षटके टाकण्याची गरज नाही. इंग्लंड आक्रमक क्रिकेट खेळत आहे. आम्हाला विचार करण्याची संधी मिळत नाही. पण पुढे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण जाईल, असे मला वाटते. पाचव्या दिवशी खेळणं कठीण जाणार आहे. कसोटी तूल्यबळ असून कोणच्या बाजूने झुकेल सांगता येत नाही. आम्ही सकाळी परतण्याचा प्रयत्न करू. दबावातून बाहेर पडणं गरजेचं आहे.”, असं आर अश्विनने सांगितलं.

इंग्लंडचे दोन गडी बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. अश्विन आणि सिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे आता जसप्रीत बुमराहकडे आशा लागून आहेत. सकाळच्या सत्रात झटपट विकेट घेण्यास यश मिळालं तर टीम इंडिया कमबॅक करेल. अन्यथा हा सामना इंग्लंडच्या गोटातून खेचून आणणं कठीण आहे. दुसऱ्या डावात किमात भारताकडे 100 धावांची आघाडी असायला हवी. कारण विकेट जशी जुनी होईल, तसं फलंदाजी करणं कठीण जाणार हे मात्र खरं आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात 250 ते 300 धावांचं आव्हान पुरेसं असेल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.