AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : जिंकायचंय तर इतिहास घडवावा लागणार, टीम इंडिया रेकॉर्ड चेस करणार?

India vs South Africa Super 8 1st Innings : टीम इंडियाला सुपर 8 मध्ये विजयी सलामी द्यायची असेल तर टी 20i वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवावा लागणार आहे. भारतासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 188 धावांचं आव्हान आहे.

IND vs SA : जिंकायचंय तर इतिहास घडवावा लागणार, टीम इंडिया रेकॉर्ड चेस करणार?
David Miller and Surya Shivan IND vs SA Super 8Image Credit source: Social Media and Bcci X Account
| Updated on: Feb 22, 2026 | 10:04 PM
Share

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 मधील तिसऱ्या आणि एकूण 43 व्या सामन्यात टीम इंडियासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहत सुपर 8 पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन सलग पाचवा सामना जिंकणार की दक्षिण आफ्रिका विजयी पंच लगावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

दक्षिण आफ्रिकेचं टॉप ऑर्डर ढेर

एडन मार्करम याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 वेगवान भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. या दोघांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी गुडघे टेकले. क्विंटन डी कॉक, एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन या तिघांनी प्रत्येकी 7-7 चेंडूंचा सामना केला. या तिघांनी 6, 4 आणि 7 अशा धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 आऊट 20 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाने कमाल केली.

दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाची कमाल

डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हीड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 187 धावांपर्यंत पोहचता आलं. डेवाल्ड आणि डेव्हीड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी स्फोटक भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी 50 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या भागीदारी दरम्यान फटकेबाजी करुन टीम इंडियाचं आणि भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवलं. या जोडीने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र शिवम दुबे याने ही जोडी फोडत टीम इंडियाची डोकेदुखी घालवली. डेवाल्डने 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 45 धावांची खेळी केली.

ट्रिस्टन स्टब्सचा फिनिशिंग टच

त्यानंतर मिलरने स्टब्स याच्यासह पाचव्या विकेटसाठी 20 बॉलमध्ये 35 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने मिलरला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिलरने 35 चेंडूत 3 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 63 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 44 धावा करत फिनिशिंग टच दिला. स्टब्सने 24 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. स्टब्सने या खेळीत 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह याने दोघांचा काटा काढला. तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

दरम्यान टीम इंडियाला विजयी व्हायचं असेल तर इतिहास घडवावा लागणार आहे. टीम इंडियाने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच सर्वोच्च 173 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन इतिहास घडवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.