AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : टीम इंडियाने रायपूरमध्ये किती सामने खेळलेत? रोहितला सलग दुसऱ्या अर्धशतकाची संधी

India vs South Africa 2nd Odi: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाने विजयी सुरुवात केली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा रायपूरमध्ये होणार आहे. टीम इंडियाने या मैदानात एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे.

IND vs SA : टीम इंडियाने रायपूरमध्ये किती सामने खेळलेत? रोहितला सलग दुसऱ्या अर्धशतकाची संधी
Indian Cricket Team Rohit SharmaImage Credit source: Bcci
| Updated on: Dec 02, 2025 | 10:35 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 3 डिसेंबरला होणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. भारताने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वात रांचीत 30 नोव्हेंबरला झालेल्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला होत. त्यामुळे भारताकडे दुसरा सामना जिंकून आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. या दुसर्‍या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाने या स्टेडियममध्ये किती सामने खेळलेत? भारताची या मैदानातील कामगिरी कशी आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया रायपूरमध्ये ‘अजिंक्य’

टीम इंडियाने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आतापर्यंत एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकला होता. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2023 साली पहिला आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. रोहित शर्मा याने टीम इंडियाला विजयी केलं होतं. त्यामुळे केएल राहुल याच्याकडे रोहितनंतर भारताला या मैदानात विजयी करण्याची संधी आहे.

न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात काय झालं होतं?

भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 34.2 ओव्हरमध्ये 108 रन्सवर गुंडाळलं होतं. भारताने हे आव्हान 121 बॉलमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने 20.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 111 रन्स केल्या होत्या. भारतासाठी तत्कालिन कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावलं होतं. रोहितने 51 रन्स केल्या होत्या. तर शुबमन गिल याने 40 धावांचं योगदान दिलं होतं.

रोहित सलग दुसरं अर्धशतक झळकावणार?

रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूरमध्ये मैदानात सलग दुसरं अर्धशतक करणाची संधी आहे. तसेच रोहितने दक्षिण आफ्रकेविरुद्ध पहिल्या सामन्यातही अर्धशतक झळकावलं होतं.

रांचीत विराटचं शतक

दरम्यान विराट कोहली याने रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांची खेळी केली होती. तसेच रोहितनेही 57 धावा केल्या होत्या. विराट-रोहित या जोडीने भारताला विजयी करण्यात प्रमुख योगदान दिलं.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला बुधवारी 3 नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागणार हे निश्चित होईल.

Follow Us
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.