AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : 2 मालिका-5 सामने; टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडणार! जाणून घ्या तारीख

India vs Sri Lanka Test Series 2026 : आयपीएल 2026 स्पर्धा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. जाणून घ्या.

IND vs SL : 2 मालिका-5 सामने; टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडणार! जाणून घ्या तारीख
Indian Test Cricket TeamImage Credit source: Getty Images
| Updated on: May 18, 2026 | 9:09 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाची आयपीएलनंतर अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी आणि आणि एकदिवसीय मालिका नियोजित आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने आणखी एका संघासह मालिका निश्चित केल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या कसोटी मालिकेत एकूण 2 सामने होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेच्या तारखेबाबत काही निश्चित माहिती नाही. मात्र 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान ही मालिका खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळी अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भारताचा श्रीलंका दौरा 2026

क्रिकबझच्या वृत्तानुसार, लंका प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील अंतिम सामना हा 9 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच कसोटी मालिकेनंतर उभयसंघात टी 20I सीरिज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेत 3 सामने होणार असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती नाही.

देवजीत सैकीया हे बीसीसीआय सचिव आहेत. सैकीया सध्या श्रीलंकेत आहेत. त्यामुळे बीसीसीआय आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कसोटी आणि टी 20I मालिकेबाबत अंतिम चर्चा होऊ शकते.

श्रीलंकेत काही महिन्यांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे भीषण नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्तांना मदत व्हावी यासाठी श्रीलंकेविरुद्ध टी 20I मालिका खेळवण्यात येणार असल्याचा शब्द बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला दिला होता. मात्र उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका झाल्यास आयोजन हे सप्टेंबर महिन्यात केलं जाऊ शकतं.

टीम इंडियाचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी 20 मालिका होणं अपेक्षित आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीच निश्चित नाही. बीसीसीआयने बांगलादेश विरूद्धच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. खरं तर ही मालिका गेल्या वर्षी 2024 साली नियोजित करण्यात आली होती. बांगलादेश-भारत यांच्यातील तणावामुळे ही मालिका स्थगित करण्यात आली होती.

त्यानंतर टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करणार आहे. या दरम्यान एशियन गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच टीम इंडिया सप्टेंबरमध्ये यूएईत अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?